शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गोटखिंडीत पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

गोटखिंडी : गोटखिंडी, ता. वाळवा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल बारा लाख ७०० रुपये थकीत आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीने ...

गोटखिंडी : गोटखिंडी, ता. वाळवा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल बारा लाख ७०० रुपये थकीत आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाची बारा लाख ७०० रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित आहे. पाणीपट्टी वसूल होत नसल्यामुळे ग्रामपंचायत महावितरणची थकबाकी भरू शकली नाही. यामुळेच महावितरणने ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे ग्रामस्थांना ऐनपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या माहितीनुसार पाणीपट्टी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण आहे. यामुळे पाणी वसुलीला अडचणी येत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाणीपट्टीचे पैसे नियमित भरणाऱ्या नागरिकांना वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.