शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सदाभाऊंमागे निशिकांत दादांची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:25 IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देइचलकरंजीच्या सदाभाऊ खोत यांच्या मेळाव्यावर विरोधकांची टीकामेळाव्यास वाळवा, शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक फारसे नाहीत. संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांची ताकद

अशोक पाटीलइस्लामपूर , दि. २ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे.

सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या ताकदीवरच संघटनेची स्थापना केली आहे. कारण या संघटनेच्या पाठीशी इस्लामपूरचे नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील तसेच आष्ट्याचे वैभव शिंदे यांनीच ताकद लावल्याचे दिसत आहे.

संघटना मजबूत करण्यासाठी निशिकांत पाटील प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत. सदाभाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमात ते व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. त्यामुळे रयत क्रांती संघटना भाजपपुरस्कृत आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

त्यातच सदाभाऊ खोत यांनी शनिवारी इचलकरंजी येथे झालेल्या मेळाव्यात आपण उसाचा दर ठरवू, असे सांगितले होते. या मेळाव्यास वाळवा व शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक फारसे दिसले नाहीत.

सदाभाऊंनी एफआरपीवर ३०० रुपये जादा घेणारच, अशी घोषणा यावेळी केली. त्यावर शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, सध्या उसाच्या नऊ टक्के उताºयाला २५५० रुपये एफआरपी आहे. त्यावर ३०० रुपये अधिक म्हणजे एकूण दर २८५० रुपये होतो.

जर ११ ते १२ च्या दरम्यान उतारा असेल, तर हा दर ३४५० रुपये जाईल. त्यावर ६५० रुपये तोडणी व वाहतूक वजा करता हा दर २८५० रुपयांवर येणार आहे. त्यामुळे सदाभाऊंची मागणी सरकारच्याच बाजूने असल्याचे दिसते. कर्नाटकातील कारखाने जाग्यावर ३००० रुपये देत असतील, तर आपल्या भागातील कारखान्यांनी किमान पहिला हप्ता ३५०० रुपये देणे गरजेचे आहे.घोडेस्वार कितीही पट्टीचा असला तरी, एकाचवेळी दोन घोड्यांवर बसू शकत नाही. एक तर शेतकरी चळवळीत रहावे किंवा सत्तेत सामील व्हावे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री आणि साखरसम्राटांना खूष करण्यासाठी उसाच्या दराच्या ८० टक्के एफआरपी दिली तरी चालेल, असे म्हणून शेतकºयांच्या अन्नात विष कालवणारे राजू शेट्टी आणि खोत शेतकरी चळवळ चालविण्याच्या योग्यतेचे नाहीत.- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.राजू शेट्टी-सदभाऊ खोत हे शेतकºयांचे नेते नाहीत. भांडवलदारांना हाताशी धरत पैशाचा खेळ करुन इचलकरंजी येथील मेळाव्यास शेतकरी गोळा होतील, हा त्यांचा भ्रम होता. तो शेतकºयांनीच खोटा ठरवला आहे.- बी. जी. पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.सदाभाऊ खोत मंत्रीपद टिकविण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शेतकरी पाठीशी असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दसरा मेळाव्याला वाळवा-शिराळा तालुक्यातील शेतकरी फिरकले नाहीत. यावरूनच शेतकºयांचा खोत यांच्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते.- सयाजी मोरे, कार्यकारिणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना.