शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सदाभाऊंमागे निशिकांत दादांची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:25 IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देइचलकरंजीच्या सदाभाऊ खोत यांच्या मेळाव्यावर विरोधकांची टीकामेळाव्यास वाळवा, शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक फारसे नाहीत. संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांची ताकद

अशोक पाटीलइस्लामपूर , दि. २ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे.

सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या ताकदीवरच संघटनेची स्थापना केली आहे. कारण या संघटनेच्या पाठीशी इस्लामपूरचे नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील तसेच आष्ट्याचे वैभव शिंदे यांनीच ताकद लावल्याचे दिसत आहे.

संघटना मजबूत करण्यासाठी निशिकांत पाटील प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत. सदाभाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमात ते व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. त्यामुळे रयत क्रांती संघटना भाजपपुरस्कृत आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

त्यातच सदाभाऊ खोत यांनी शनिवारी इचलकरंजी येथे झालेल्या मेळाव्यात आपण उसाचा दर ठरवू, असे सांगितले होते. या मेळाव्यास वाळवा व शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक फारसे दिसले नाहीत.

सदाभाऊंनी एफआरपीवर ३०० रुपये जादा घेणारच, अशी घोषणा यावेळी केली. त्यावर शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, सध्या उसाच्या नऊ टक्के उताºयाला २५५० रुपये एफआरपी आहे. त्यावर ३०० रुपये अधिक म्हणजे एकूण दर २८५० रुपये होतो.

जर ११ ते १२ च्या दरम्यान उतारा असेल, तर हा दर ३४५० रुपये जाईल. त्यावर ६५० रुपये तोडणी व वाहतूक वजा करता हा दर २८५० रुपयांवर येणार आहे. त्यामुळे सदाभाऊंची मागणी सरकारच्याच बाजूने असल्याचे दिसते. कर्नाटकातील कारखाने जाग्यावर ३००० रुपये देत असतील, तर आपल्या भागातील कारखान्यांनी किमान पहिला हप्ता ३५०० रुपये देणे गरजेचे आहे.घोडेस्वार कितीही पट्टीचा असला तरी, एकाचवेळी दोन घोड्यांवर बसू शकत नाही. एक तर शेतकरी चळवळीत रहावे किंवा सत्तेत सामील व्हावे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री आणि साखरसम्राटांना खूष करण्यासाठी उसाच्या दराच्या ८० टक्के एफआरपी दिली तरी चालेल, असे म्हणून शेतकºयांच्या अन्नात विष कालवणारे राजू शेट्टी आणि खोत शेतकरी चळवळ चालविण्याच्या योग्यतेचे नाहीत.- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.राजू शेट्टी-सदभाऊ खोत हे शेतकºयांचे नेते नाहीत. भांडवलदारांना हाताशी धरत पैशाचा खेळ करुन इचलकरंजी येथील मेळाव्यास शेतकरी गोळा होतील, हा त्यांचा भ्रम होता. तो शेतकºयांनीच खोटा ठरवला आहे.- बी. जी. पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.सदाभाऊ खोत मंत्रीपद टिकविण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शेतकरी पाठीशी असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दसरा मेळाव्याला वाळवा-शिराळा तालुक्यातील शेतकरी फिरकले नाहीत. यावरूनच शेतकºयांचा खोत यांच्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते.- सयाजी मोरे, कार्यकारिणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना.