शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

समाजाला जोडण्याची ताकद धर्मात: चारूकीर्ती स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:06 IST

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. ...

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. जनतेच्या हृदयातील धर्माचे संवर्धन करणे गरजेचे असून, मंदिरापेक्षाही लोकांच्या हृदयात त्याचे स्थान आहे. समाजात होत असलेली क्रांती पाहता, एकतेसाठी धर्म काम करतो. त्यामुळे समाजाला जोडण्याची ताकद धर्मात आहे, असे प्रतिपादन श्रवणबेळगोळ येथील जैन मठाचे प्रमुख स्वस्तिश्री चारुकीर्ती महास्वामी यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या महास्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, विविध विषयांवर आपली मते नोंदवत, समाजाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे आवर्जून सांगितले.ते म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या नवीन पिढी प्रगल्भ होत आहे. तरूणांमध्ये आस्तिकता वाढत आहे. धर्ममार्गात तेही येऊ शकतात. त्यामुळे या पिढीत धर्माप्रति रुची निर्माण करण्याची गरज आहे. परिवर्तनशील बनलेल्या समाजात निरंतर जागृतीची आवश्यकता आहे. संस्कृतीला सुरक्षित राखण्याचे काम सर्वच घटकांनी केले पाहिजे. समाजाला जोडण्याच्या भूमिकेत धर्म असतो, तर तोडणारा अधर्म असतो. नव्या समाजात शांतीची प्रत्येकाला गरज असल्याने, दोष सोडून सहनशीलतेमुळे परिवारात आनंद निर्माण होऊ शकतो. क्रियेला प्रतिक्रिया दिल्यानेच वादविवाद निर्माण होतात.प्राकृत भाषेला सर्वजण विसरले होते. मात्र, याच भाषेत जैन समाजाचे सार असल्याने पुन्हा स्थापित करण्यात येत आहे. या विषयावर पन्नासहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाहन वापरणे सोडले होते. भगवान महावीरांचे विचार यातून दिले आहेत. श्रवणबेळगोळ येथील हॉस्पिटल नसून त्याला आम्ही मंदिर म्हणतो. गेल्या २५ वर्षांपासून परिसरातील बेरोजगारी मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राकृत विश्वविद्यालयाची स्थापना करून प्राकृत, संस्कृत व पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी, सनतकुमार आरवाडे आदी उपस्थित होते.