शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

समाजाला जोडण्याची ताकद धर्मात: चारूकीर्ती स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:06 IST

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. ...

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. जनतेच्या हृदयातील धर्माचे संवर्धन करणे गरजेचे असून, मंदिरापेक्षाही लोकांच्या हृदयात त्याचे स्थान आहे. समाजात होत असलेली क्रांती पाहता, एकतेसाठी धर्म काम करतो. त्यामुळे समाजाला जोडण्याची ताकद धर्मात आहे, असे प्रतिपादन श्रवणबेळगोळ येथील जैन मठाचे प्रमुख स्वस्तिश्री चारुकीर्ती महास्वामी यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या महास्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, विविध विषयांवर आपली मते नोंदवत, समाजाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे आवर्जून सांगितले.ते म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या नवीन पिढी प्रगल्भ होत आहे. तरूणांमध्ये आस्तिकता वाढत आहे. धर्ममार्गात तेही येऊ शकतात. त्यामुळे या पिढीत धर्माप्रति रुची निर्माण करण्याची गरज आहे. परिवर्तनशील बनलेल्या समाजात निरंतर जागृतीची आवश्यकता आहे. संस्कृतीला सुरक्षित राखण्याचे काम सर्वच घटकांनी केले पाहिजे. समाजाला जोडण्याच्या भूमिकेत धर्म असतो, तर तोडणारा अधर्म असतो. नव्या समाजात शांतीची प्रत्येकाला गरज असल्याने, दोष सोडून सहनशीलतेमुळे परिवारात आनंद निर्माण होऊ शकतो. क्रियेला प्रतिक्रिया दिल्यानेच वादविवाद निर्माण होतात.प्राकृत भाषेला सर्वजण विसरले होते. मात्र, याच भाषेत जैन समाजाचे सार असल्याने पुन्हा स्थापित करण्यात येत आहे. या विषयावर पन्नासहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाहन वापरणे सोडले होते. भगवान महावीरांचे विचार यातून दिले आहेत. श्रवणबेळगोळ येथील हॉस्पिटल नसून त्याला आम्ही मंदिर म्हणतो. गेल्या २५ वर्षांपासून परिसरातील बेरोजगारी मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राकृत विश्वविद्यालयाची स्थापना करून प्राकृत, संस्कृत व पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी, सनतकुमार आरवाडे आदी उपस्थित होते.