शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

समाजाला जोडण्याची ताकद धर्मात: चारूकीर्ती स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:06 IST

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. ...

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. जनतेच्या हृदयातील धर्माचे संवर्धन करणे गरजेचे असून, मंदिरापेक्षाही लोकांच्या हृदयात त्याचे स्थान आहे. समाजात होत असलेली क्रांती पाहता, एकतेसाठी धर्म काम करतो. त्यामुळे समाजाला जोडण्याची ताकद धर्मात आहे, असे प्रतिपादन श्रवणबेळगोळ येथील जैन मठाचे प्रमुख स्वस्तिश्री चारुकीर्ती महास्वामी यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या महास्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, विविध विषयांवर आपली मते नोंदवत, समाजाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे आवर्जून सांगितले.ते म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या नवीन पिढी प्रगल्भ होत आहे. तरूणांमध्ये आस्तिकता वाढत आहे. धर्ममार्गात तेही येऊ शकतात. त्यामुळे या पिढीत धर्माप्रति रुची निर्माण करण्याची गरज आहे. परिवर्तनशील बनलेल्या समाजात निरंतर जागृतीची आवश्यकता आहे. संस्कृतीला सुरक्षित राखण्याचे काम सर्वच घटकांनी केले पाहिजे. समाजाला जोडण्याच्या भूमिकेत धर्म असतो, तर तोडणारा अधर्म असतो. नव्या समाजात शांतीची प्रत्येकाला गरज असल्याने, दोष सोडून सहनशीलतेमुळे परिवारात आनंद निर्माण होऊ शकतो. क्रियेला प्रतिक्रिया दिल्यानेच वादविवाद निर्माण होतात.प्राकृत भाषेला सर्वजण विसरले होते. मात्र, याच भाषेत जैन समाजाचे सार असल्याने पुन्हा स्थापित करण्यात येत आहे. या विषयावर पन्नासहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाहन वापरणे सोडले होते. भगवान महावीरांचे विचार यातून दिले आहेत. श्रवणबेळगोळ येथील हॉस्पिटल नसून त्याला आम्ही मंदिर म्हणतो. गेल्या २५ वर्षांपासून परिसरातील बेरोजगारी मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राकृत विश्वविद्यालयाची स्थापना करून प्राकृत, संस्कृत व पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी, सनतकुमार आरवाडे आदी उपस्थित होते.