शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकातच

By admin | Updated: December 15, 2015 00:44 IST

शेखर गायकवाड : रेणावी येथे १४ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

विटा : जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकात असते. पुस्तके माणसांचे आयुष्य बदलून टाकतात. गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात यांच्यासारखे महान साहित्यिक माणदेशाने महाराष्ट्राला दिले. परंतु, महाराष्ट्राला त्यांची कदर नाही, अशी खंत व्यक्त करून, व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ला नोबेल पारितोषिक देण्याची खरी गरज असल्याची अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.रेणावी (ता. खानापूर) येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या सहयोगाने श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, कला विकास मंचच्यावतीने रविवारी १४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. या संमेलनावेळी बाल साहित्य मंचचे उद्घाटन ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील, सरपंच सौ. रेखा भिंगारदेवे उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, लहान मुले फार संवेदनाक्षम असतात. शाळेतील मुलांच्या कथा, कविता व लेख यांचे मोठे पोस्टर तयार करून शाळेतील भिंतीवर लावले पाहिजे. जेणेकरून त्यांची प्रेरणा घेऊन इतर मुले लिहिती होतील. सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांची बैठक लवकरच घेण्यात येणार असून सर्व साहित्यिकांची पुस्तके व त्यांची छायाचित्रे जिल्ह्यातील वेबसाईटमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे. यावेळी ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांनी, मुले लहान असताना त्यांना कथा, कविता लिहिण्याची आवड असते. त्यामुळे पालकांनी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. श्रीमती शहाबाई यादव विकास मंचचे सचिव धर्मेंद्र पवार यांनी स्वागत केले. रेणावी येथे ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे नवोदित साहित्यिकांना मोठी संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या संमेलनात राजा मंगसुळीकर, अनिल पाटील, सतीश लोखंडे, सु. धों. मोहिते, विश्वनाथ गायकवाड, एम. बी. जमादार, रघुराज मेटकरी, राहुल वीर यांनी कविता सादर केल्या. या संमेलनास बाळासाहेब लकडे, देवदत्त राजोपाध्ये, विलास पाटील, प्रा. संजय ठिगळे, किमया पाटील, सीमा सावंत, पद्माकर यादव, जितेंद्र यादव उपस्थित होते. (वार्ताहर)रसिकांची दादसाहित्यिक अस्मिता इनामदार, दयासागर बन्ने, जगन्नाथ विभुते यांना ‘श्रीमती शहाबाई यादव गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संमेलनावेळी व्यासपीठावर पन्नासहून अधिक बालसाहित्यिकांनी आपल्या कथा, कविता, कथाकथन सादर केले. त्यास रसिकांनी दाद दिली.