शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकातच

By admin | Updated: December 15, 2015 00:44 IST

शेखर गायकवाड : रेणावी येथे १४ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

विटा : जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकात असते. पुस्तके माणसांचे आयुष्य बदलून टाकतात. गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात यांच्यासारखे महान साहित्यिक माणदेशाने महाराष्ट्राला दिले. परंतु, महाराष्ट्राला त्यांची कदर नाही, अशी खंत व्यक्त करून, व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ला नोबेल पारितोषिक देण्याची खरी गरज असल्याची अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.रेणावी (ता. खानापूर) येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या सहयोगाने श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, कला विकास मंचच्यावतीने रविवारी १४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. या संमेलनावेळी बाल साहित्य मंचचे उद्घाटन ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील, सरपंच सौ. रेखा भिंगारदेवे उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, लहान मुले फार संवेदनाक्षम असतात. शाळेतील मुलांच्या कथा, कविता व लेख यांचे मोठे पोस्टर तयार करून शाळेतील भिंतीवर लावले पाहिजे. जेणेकरून त्यांची प्रेरणा घेऊन इतर मुले लिहिती होतील. सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांची बैठक लवकरच घेण्यात येणार असून सर्व साहित्यिकांची पुस्तके व त्यांची छायाचित्रे जिल्ह्यातील वेबसाईटमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे. यावेळी ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांनी, मुले लहान असताना त्यांना कथा, कविता लिहिण्याची आवड असते. त्यामुळे पालकांनी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. श्रीमती शहाबाई यादव विकास मंचचे सचिव धर्मेंद्र पवार यांनी स्वागत केले. रेणावी येथे ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे नवोदित साहित्यिकांना मोठी संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या संमेलनात राजा मंगसुळीकर, अनिल पाटील, सतीश लोखंडे, सु. धों. मोहिते, विश्वनाथ गायकवाड, एम. बी. जमादार, रघुराज मेटकरी, राहुल वीर यांनी कविता सादर केल्या. या संमेलनास बाळासाहेब लकडे, देवदत्त राजोपाध्ये, विलास पाटील, प्रा. संजय ठिगळे, किमया पाटील, सीमा सावंत, पद्माकर यादव, जितेंद्र यादव उपस्थित होते. (वार्ताहर)रसिकांची दादसाहित्यिक अस्मिता इनामदार, दयासागर बन्ने, जगन्नाथ विभुते यांना ‘श्रीमती शहाबाई यादव गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संमेलनावेळी व्यासपीठावर पन्नासहून अधिक बालसाहित्यिकांनी आपल्या कथा, कविता, कथाकथन सादर केले. त्यास रसिकांनी दाद दिली.