शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कवठेमहांकाळमध्ये भ्रष्टाचार

By admin | Updated: April 12, 2017 23:40 IST

अजितराव घोरपडे : पाणलोट विकास कामांच्या चौकशीची मागणी

कवठेमहांकाळ : सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात व इतर योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून, याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकासअंतर्गत केलेल्या कामांची माहिती द्यावी, अशी मागणी अजितराव घोरपडे यांच्यासह कुंडलापूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्यावतीने कृषी अधिकारी अमृतसागर यांच्याकडे केली.कवठेमहांकाळ तालुका कृषी कार्यालयातील एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कामात लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याची ओरड कुंडलापूर येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी अजितराव घोरपडे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह तालुका कृषी अधिकारी अमृतसागर यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी अजितराव घोरपडे यांच्यासमोर अधिकाऱ्यांवर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.शासनाने मोठा गाजावाजा करत एकात्मिक पाणलोट विकास अभियान हाती घेतले. या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा शासनाचा जरी प्रयत्न असला तरी शासनाने नियुक्त केलेलेच कर्मचारी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात मोठ्य प्रमाणात भ्रष्टाचार करून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप कुंडलापूर येथील शेतकऱ्यांनी केला आहे. येथील तालुका कृषी अधिकारी अमृतसागर केवळ नामधारी असून, कृषी पर्यवेक्षक अनिल पाटील हेच कामकाज चालवितात की काय?, असा सवाल शेतकरी विचारत असून, त्यांच्या कामामुळे कृषी अधिकारी नामोहरम असल्याचे दिसून येत आहे. या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधला असता, थातूर-मातूर उत्तरे देण्यात आली असल्याने त्या गावात किमान ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा आहे. या अपहारप्रकरणी लवकरच एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.तालुक्यात शेततळी, नालाबंडिंग, सिमेंट बंधारे आदी कामे झाली आहेत. कुंडलापूर येथे पंधरा हजार रुपयांची माहिती पुस्तके वितरित केली आहेत. मात्र प्रत्यक्षात गावात एकाही लाभार्थ्याला माहितीपुस्तके मिळाली नाहीत. तसेच अव्वाच्या सव्वा दराने सोलर खरेदी केले आहेत. जुन्याच बंधाऱ्यावर नवीन बंधारा बांधून बिले काढली आहेत. तसेच शेतीसाठी दिलेल्या अनुदानाचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप पोपट गिड्डे यांनी अमृतसागर यांच्याकडे केला. यावेळी तानाजी यमगर, सुनील पाटील, दादासाहेब कोळी, दिलीप झुरे, वैभव नरुटे उपस्थित होते. (वार्ताहर)