शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

उष्ण हवामानामुळे कुक्कुटपालन धोक्यात

By admin | Updated: April 12, 2016 23:11 IST

दुष्काळात तेरावा : ढगाळ वातावरणाचाही फटका; व्यावसायिक चिंतित

खामखेडा : वाढत्या उष्ण व बदलत्या हवामानात पोल्ट्री फार्ममधील पक्षी जगू शकत नसल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. परिणामी पोल्ट्री फॉर्म शेड ओसाड पडत आहेत. वीस वर्षांपूर्वी शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी पाळत. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत. त्याचबरोबर गावठी कोंबड्याही पाळत असत.जसजसा शेतीचा विकास होत गेला तसतसा शेतीपूरक जोडधंद्यांमध्येही बदल होत गेला. दुय्यम दर्जाच्या व्यवसायाची गरज भासू लागल्याने व जोडधंद्यातून पैसा मिळू लागल्याने शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागले. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेडमध्ये वाढ झाली आहे. पोल्ट्री बांधकामासाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा जास्त शेड उभारणीसाठी येतो. गावातील सोसायटी, बँका या व्यवसायासाठी कर्जपुरवठा करू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे सुशिक्षित मुले नोकरीऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत.कुक्कुट पालनातून चार पैसे हाती येऊ लागल्याने अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळले. चालू वर्षी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. कोंबड्यांसाठी थंड हवामान पोषक असते. उष्ण हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो. उष्ण हवामाना-पासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर उसाचे पाचड, बारदान, नारळाच्या झाडाच्या फांद्या इत्यादि टाकून थंडावा निर्माण केला जात आहे. एवढे करूनही या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे अनेक पोल्ट्री कंपन्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक शेड रिकामे दिसत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायासाठी सोसायट्या, बँकांकडून घेतलेले कर्ज कसे परत करावे याची चिंता पोल्ट्री व्यावसायिक करीत आहेत. (वार्ताहर)