शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

जत तालुक्यातील ४८ पाणी योजनांचे होणार पाेस्टमार्टम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:43 IST

पाणी पुरवठा समिती, तांत्रिक सेवा पुरवठादार आणि ठेकेदारांना महिन्यात कामे पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. या कालावधित काम ...

पाणी पुरवठा समिती, तांत्रिक सेवा पुरवठादार आणि ठेकेदारांना महिन्यात कामे पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. या कालावधित काम पूर्ण न झाल्यास दोषींच्या मालमत्तांवर बोजा चढवून योजनांच्या कामाची रक्कम वसुल करण्याचा इशाराही डुडी यांनी दिला आहे.

जत तालुका शंभर टक्के दुष्काळी आहे. म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांमुळे काही भागामध्ये सध्या पाणी आहे. पण पिण्याच्या पाण्याची तर नेहमीच टंचाई आहे. जत तालुक्यातील गावांसाठी भारत निर्माण, स्वजलधारा, जलस्वराज आदी योजनांमधून पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही ४८ गावांमधील पाणी पुरवठा योजना गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. सूचना देऊनही गावांनी पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण केली नाहीत. या प्रकरणात डुडी यांनी गंभीर लक्ष घातले असून दि. १६ डिसेंबर रोजी जत येथे भेट देऊन पाणी योजनांची कामे पाहणार आहेत. अपूर्ण योजनांच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. गावातील पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, तांत्रिक सेवा पुरवठादार यांनी पाणी योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अन्यथा दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर थकीत कामाच्या रकमेची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. यामुळे संबंधित गावांनी एका महिन्यात कामे पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा सुरू करावा, असे आदेश डुडी यांनी दिले आहेत.

चौकट

चार लाख कुटुंबांना पाणी कनेक्शन

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी अपूर्ण पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला पाणी कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यानुसार चार लाख कुटुंबांना पाणी कनेक्शन देण्याची मोहीम चालू आहे, असे डुडी यांनी सांगितले.