शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

प्रशासनात आजपासून टपाल ई-ट्रॅकिंग

By admin | Updated: July 10, 2017 23:50 IST

प्रशासनात आजपासून टपाल ई-ट्रॅकिंग

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा प्रशासनाकडे दाखल होणाऱ्या प्रत्येक कागदपत्रांचा प्रवास सर्वांना कळावा, म्हणून मंगळवार, ११ जुलैपासून ई-ट्रॅकिंगची अंमलबजावणी सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील महसूल विभागाचा कारभार पारदर्शीपणाने आणि गतीने कार्यरत व्हावा, म्हणून गेला महिनाभर आमचे प्रयत्न सुरू आहेत. झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल (दैनंदिन निपटारा) यावर सर्वाधिक लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील अनेक महसुली कार्यालयांमध्ये कागदपत्रांचा बेशिस्तपणा दिसून आला. तहसील किंवा अन्य कोणत्याही कार्यालयात येणाऱ्या पत्रांच्या नोंदी कार्यविवरण नोंदवहीत होत नाहीत. त्यामुळे कागदांच्या ढिगाऱ्यात हरविलेली कार्यालये निदर्शनास आली आहेत. हा सर्व प्रकार दुरुस्त करून कार्यालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक अर्जाची, पत्रांची नोंद रितसर होऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठीच मंगळवारपासून टपाल ई-ट्रॅकिंग सॉफ्टवेअर सुरू करण्यात येणार आहे. कागदपत्रे दाबून ठेवण्याचा प्रकार मंगळवारपासून बंद होईल. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कागदाचा महसूल विभागातील प्रवास रोजच्या रोज कळू शकेल. झिरो पेंडन्सी योजनेसाठी याचा लाभ होणार आहे. सेतू कार्यालयांमधील कागदपत्रांचाही निपटारा रोजच्या रोज होईल आणि विद्यार्थी, पालकांना तातडीने दाखले मिळतील, याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ११ सेतू कार्यालयांवर तहसीलदारांनी दररोजचा ‘वॉच’ सुरू केला आहे. त्यामुळे सेतू कार्यालयातील कामकाजामध्ये लवकरच बदल होईल. महसूल विभागाच्या १ लाख ३ हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती संगणकावर घेतली असली तरी, सॉफ्टवेअरचा वापर अद्याप त्यासाठी होत नाही. संगणकीय सात-बारा योजनेत सांगली जिल्हा गत महिन्यात राज्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता. मी पदभार घेतल्यानंतर या विषयात लक्ष घातले आणि आता तब्बल ७ क्रमांकाने जिल्हा पुढे आला आहे. लवकरच पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आपला समावेश होईल, यादृष्टीने काम सुरू आहे. संगणकीय सात-बारा नोंदीची टक्केवारी ७९.९२ वरून आता ९४.२९ टक्क्यांवर गेली आहे. जलयुक्त शिवारची उद्दिष्टपूर्ती जुलैअखेरजलयुक्त शिवार योजनेच्या कामात सर्वाधिक लक्ष घातले आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील कामांच्या आकडेवारीत तफावत असल्याने ती प्रथम दुरुस्त केली आहे. जलयुक्तच्या ४ हजार ३२ कामांचे उद्दिष्ट जिल्ह्यासमोर होते. आजअखेर यातील ३ हजार ४५३ कामे पूर्ण झाली असून, १ हजार २५७ कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या ३१ जुलैअखेर उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वासही विजयकुमार काळम-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.