शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

प्रशासनात आजपासून टपाल ई-ट्रॅकिंग

By admin | Updated: July 10, 2017 23:50 IST

प्रशासनात आजपासून टपाल ई-ट्रॅकिंग

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा प्रशासनाकडे दाखल होणाऱ्या प्रत्येक कागदपत्रांचा प्रवास सर्वांना कळावा, म्हणून मंगळवार, ११ जुलैपासून ई-ट्रॅकिंगची अंमलबजावणी सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील महसूल विभागाचा कारभार पारदर्शीपणाने आणि गतीने कार्यरत व्हावा, म्हणून गेला महिनाभर आमचे प्रयत्न सुरू आहेत. झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल (दैनंदिन निपटारा) यावर सर्वाधिक लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील अनेक महसुली कार्यालयांमध्ये कागदपत्रांचा बेशिस्तपणा दिसून आला. तहसील किंवा अन्य कोणत्याही कार्यालयात येणाऱ्या पत्रांच्या नोंदी कार्यविवरण नोंदवहीत होत नाहीत. त्यामुळे कागदांच्या ढिगाऱ्यात हरविलेली कार्यालये निदर्शनास आली आहेत. हा सर्व प्रकार दुरुस्त करून कार्यालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक अर्जाची, पत्रांची नोंद रितसर होऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठीच मंगळवारपासून टपाल ई-ट्रॅकिंग सॉफ्टवेअर सुरू करण्यात येणार आहे. कागदपत्रे दाबून ठेवण्याचा प्रकार मंगळवारपासून बंद होईल. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कागदाचा महसूल विभागातील प्रवास रोजच्या रोज कळू शकेल. झिरो पेंडन्सी योजनेसाठी याचा लाभ होणार आहे. सेतू कार्यालयांमधील कागदपत्रांचाही निपटारा रोजच्या रोज होईल आणि विद्यार्थी, पालकांना तातडीने दाखले मिळतील, याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ११ सेतू कार्यालयांवर तहसीलदारांनी दररोजचा ‘वॉच’ सुरू केला आहे. त्यामुळे सेतू कार्यालयातील कामकाजामध्ये लवकरच बदल होईल. महसूल विभागाच्या १ लाख ३ हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती संगणकावर घेतली असली तरी, सॉफ्टवेअरचा वापर अद्याप त्यासाठी होत नाही. संगणकीय सात-बारा योजनेत सांगली जिल्हा गत महिन्यात राज्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता. मी पदभार घेतल्यानंतर या विषयात लक्ष घातले आणि आता तब्बल ७ क्रमांकाने जिल्हा पुढे आला आहे. लवकरच पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आपला समावेश होईल, यादृष्टीने काम सुरू आहे. संगणकीय सात-बारा नोंदीची टक्केवारी ७९.९२ वरून आता ९४.२९ टक्क्यांवर गेली आहे. जलयुक्त शिवारची उद्दिष्टपूर्ती जुलैअखेरजलयुक्त शिवार योजनेच्या कामात सर्वाधिक लक्ष घातले आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील कामांच्या आकडेवारीत तफावत असल्याने ती प्रथम दुरुस्त केली आहे. जलयुक्तच्या ४ हजार ३२ कामांचे उद्दिष्ट जिल्ह्यासमोर होते. आजअखेर यातील ३ हजार ४५३ कामे पूर्ण झाली असून, १ हजार २५७ कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या ३१ जुलैअखेर उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वासही विजयकुमार काळम-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.