शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

सकारात्मक दृष्टिकोन आनंदी जीवनाची गुरुकिल्ली : असिरा चिरमुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:24 IST

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला

ठळक मुद्देवाई येथे लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या आयोजित वसंत व्याख्यानमालेत प्रतिपादन

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला शोधत येते, माणसाने जर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास जीवन आंनदी व सुखी होते. सकारात्मक दृष्टिकोन हा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे,’ असे प्रतिपादन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ असिरा चिरमुले यांनी केले.

लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोशाचे अभ्यागत संपादक डॉ. सुरेश देशपांडे हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंगकर, उपाध्यक्ष प्रा. सदाशिव फडणीस, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत रांजणे, कार्यवाहक वसंतराव बोपर्डीकर, सहकार्यवाहक अनिल जोशी, विश्वस्त सुनील शिंदे, अ‍ॅड. शांतिलाल ओसवाल, अजित खामकर, मधनकुमार साळवेकर, विशाल कानडे यांची उपस्थिती होती.चिरमुले म्हणाल्या, सध्याचा मानव चंद्रावर जाऊन पोहोचला तरीही दुसºयाची निंदा-नालस्ती करण्याचे थांबलेला नाही. दुसºयाला पाण्यात पाहण्याने शिखराला गवसणी घालणारा परमोच्च आंनद मिळतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो.

असिरा चिरमुले यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत मनुष्य जीवनात आनंद शोधण्यासाठी किती धडपडत असतो, हे अनेक उदाहरणे देऊन संवाद साधला. कार्यक्रमाचे लक्ष्मीकांत रांजणे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा प्रा.आनंद घोरपडे यांनी परिचय करून दिला. डॉ. रुपाली अभ्यंगकर यांनी आभार मानले.तरच यश मिळते...दुसºयाचा दुस्वा:स करणे सोडून द्या, जीवनात मिळालेल्या संधीच सोनं करा, समाजकार्यात स्वत:ला नि:स्वार्थीपणे झोकून दिल्यास खरा आनंद प्राप्त होतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो. तुमचे कर्मच दु:खाला निमंत्रण देत असते. मिळणाºया फळाची आशा न बाळगता कार्य केल्यास यश निश्चितच मिळते व तो आनंद पराकोटीचा असतो.