शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सकारात्मक दृष्टिकोन आनंदी जीवनाची गुरुकिल्ली : असिरा चिरमुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:24 IST

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला

ठळक मुद्देवाई येथे लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या आयोजित वसंत व्याख्यानमालेत प्रतिपादन

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला शोधत येते, माणसाने जर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास जीवन आंनदी व सुखी होते. सकारात्मक दृष्टिकोन हा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे,’ असे प्रतिपादन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ असिरा चिरमुले यांनी केले.

लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोशाचे अभ्यागत संपादक डॉ. सुरेश देशपांडे हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंगकर, उपाध्यक्ष प्रा. सदाशिव फडणीस, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत रांजणे, कार्यवाहक वसंतराव बोपर्डीकर, सहकार्यवाहक अनिल जोशी, विश्वस्त सुनील शिंदे, अ‍ॅड. शांतिलाल ओसवाल, अजित खामकर, मधनकुमार साळवेकर, विशाल कानडे यांची उपस्थिती होती.चिरमुले म्हणाल्या, सध्याचा मानव चंद्रावर जाऊन पोहोचला तरीही दुसºयाची निंदा-नालस्ती करण्याचे थांबलेला नाही. दुसºयाला पाण्यात पाहण्याने शिखराला गवसणी घालणारा परमोच्च आंनद मिळतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो.

असिरा चिरमुले यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत मनुष्य जीवनात आनंद शोधण्यासाठी किती धडपडत असतो, हे अनेक उदाहरणे देऊन संवाद साधला. कार्यक्रमाचे लक्ष्मीकांत रांजणे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा प्रा.आनंद घोरपडे यांनी परिचय करून दिला. डॉ. रुपाली अभ्यंगकर यांनी आभार मानले.तरच यश मिळते...दुसºयाचा दुस्वा:स करणे सोडून द्या, जीवनात मिळालेल्या संधीच सोनं करा, समाजकार्यात स्वत:ला नि:स्वार्थीपणे झोकून दिल्यास खरा आनंद प्राप्त होतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो. तुमचे कर्मच दु:खाला निमंत्रण देत असते. मिळणाºया फळाची आशा न बाळगता कार्य केल्यास यश निश्चितच मिळते व तो आनंद पराकोटीचा असतो.