शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तेरा हजार रुग्णांसाठी जिल्ह्यातील ३२ लाख लोकसंख्या वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

सांगली : सव्वा वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी पुढे येत आहे. ज्या गावात ...

सांगली : सव्वा वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी पुढे येत आहे. ज्या गावात किंवा तालुक्यात रुग्णसंख्या जास्त असेल, तेथेच लॉकडाऊन सुरू ठेवावा, असा सूर उमटत आहे.

कमी रुग्णसंख्येच्या गावांत व तालुक्यांत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगीची मागणी होत आहे. कोरोनामुक्त गावेही सरसकट लॉकडाऊनमुळे भरडली जात आहेत. पहिल्या लाटेत शहरी भागात कोरोनाचा जोर असताना ग्रामीण भागही वेठीस धरला गेला. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना फोफावताना शहरी भागाची नाहक होरपळ सुरू आहे.

यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी विविध स्तरांतून होत आहे. जास्त रुग्णसंख्येच्या गावांत लॉकडाऊन ठेवून शेजारच्यांना सूट द्यावी, हाच निकष तालुक्यांनाही लावावा. कमी रुग्णसंख्येच्या तालुक्यांत लॉकडाऊन शिथिल करावा, सीमांची नाकाबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट

शिराळा, कडेगाव, पलूसमध्ये रुग्ण कमी, तरीही टाळेबंदीचे जोखड

दुसऱ्या लाटेत आटपाडी, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्यांत दररोजची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. खुद्द पलूस, शिराळा, कडेगाव, कवठेमहांकाळ या शहरांतही दररोजची रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी आहे. तरीही ते वेठीस धरले जात आहेत. तेथील सक्रिय रुग्णांना कडक विलगीकरणात ठेवून उर्वरित जनजीवन मोकळे करता येईल.

चौकट

असे करता येईल

- महापालिका क्षेत्रात घाऊक व किरकोळ व्यापार वेगवेगळ्या वेळेत

- जिल्हाभरातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी, जीवनावश्यक असल्यास परवानगी

- गावस्तरावरील कोरोनाग्रस्तांचे १०० टक्के विलगीकरण, उर्वरित व्यवहारांना मुभा

- कमी कोरोनासंख्येची गावे सील करून इतरांना प्रवेशबंदी, गावांतर्गत व्यवहार सुरू

- तालुकास्तरावरही कमी रुग्णसंख्या असल्यास नाकेबंदी, तालुक्यांतर्गत व्यवहारांना मुभा

चौकट

तुम्ही जबाबदारी घेणार का?

एका बैठकीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लॉकडाऊनसाठी असा फॉर्म्युला मांडला असता, लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केल्याचे समजते. यातून परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदारी घेणार का, असा सवाल विचारण्यात आला, तेव्हा अधिकाऱ्याने शांत राहणे पसंत केले.

कोट

यापुढे लॉकडाऊन सहन करण्याची शक्ती उरलेली नाही. व्यापारी स्वत:हून दुकाने उघडण्याच्या मन:स्थितीत आहेत. रुग्णसंख्या कमी असणारी गावे, शहरे सील करून अंतर्गत व्यवहारांना परवानगीची मागणी आम्ही वारंवार केली आहे. महापालिका क्षेत्रातही अंतर्गत व्यवहार सुरू ठेवता येतील. ग्रामीण भागाच्या तुलनेने महापालिका क्षेत्रात फैलाव कमी आहे, त्यामुळे सांगली-मिरजेला वेठीस धरले जाऊ नये.

- समीर शहा, अध्यक्ष, व्यापारी संघटना

लॉकडाऊनमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. कमी रुग्ण असणारी गावे लॉकडाऊनमधून वगळावीत. तेथील सक्रिय रुग्णांसाठी दक्षता समित्या, पोलीस व आरोग्य यंत्रणेने काटेकोर नियोजन करावे. इतर व्यवहारांना परवानगी द्यावी. दोन-तीन टक्के रुग्णांसाठी शंभर टक्के गाव कोंडून ठेवणे व्यवहार्य नाही.

- महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

अनेक छोट्या गावांत कोरोनाचे रुग्ण नाममात्र आहेत. तेथील लॉकडाऊन शिथिल करावा. मोठ्या गावांतही रुग्णांचे कडक विलगीकरण करून इतर व्यवहारांना मुभा द्यावी. आणखी तग धरण्याची शक्ती शेतकरी व सर्वसामान्यांत राहिलेली नाही.

- तानाजी पाटील, सरपंच सलगरे