शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

तेरा हजार रुग्णांसाठी जिल्ह्यातील ३२ लाख लोकसंख्या वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

सांगली : सव्वा वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी पुढे येत आहे. ज्या गावात ...

सांगली : सव्वा वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी पुढे येत आहे. ज्या गावात किंवा तालुक्यात रुग्णसंख्या जास्त असेल, तेथेच लॉकडाऊन सुरू ठेवावा, असा सूर उमटत आहे.

कमी रुग्णसंख्येच्या गावांत व तालुक्यांत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगीची मागणी होत आहे. कोरोनामुक्त गावेही सरसकट लॉकडाऊनमुळे भरडली जात आहेत. पहिल्या लाटेत शहरी भागात कोरोनाचा जोर असताना ग्रामीण भागही वेठीस धरला गेला. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना फोफावताना शहरी भागाची नाहक होरपळ सुरू आहे.

यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी विविध स्तरांतून होत आहे. जास्त रुग्णसंख्येच्या गावांत लॉकडाऊन ठेवून शेजारच्यांना सूट द्यावी, हाच निकष तालुक्यांनाही लावावा. कमी रुग्णसंख्येच्या तालुक्यांत लॉकडाऊन शिथिल करावा, सीमांची नाकाबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट

शिराळा, कडेगाव, पलूसमध्ये रुग्ण कमी, तरीही टाळेबंदीचे जोखड

दुसऱ्या लाटेत आटपाडी, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्यांत दररोजची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. खुद्द पलूस, शिराळा, कडेगाव, कवठेमहांकाळ या शहरांतही दररोजची रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी आहे. तरीही ते वेठीस धरले जात आहेत. तेथील सक्रिय रुग्णांना कडक विलगीकरणात ठेवून उर्वरित जनजीवन मोकळे करता येईल.

चौकट

असे करता येईल

- महापालिका क्षेत्रात घाऊक व किरकोळ व्यापार वेगवेगळ्या वेळेत

- जिल्हाभरातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी, जीवनावश्यक असल्यास परवानगी

- गावस्तरावरील कोरोनाग्रस्तांचे १०० टक्के विलगीकरण, उर्वरित व्यवहारांना मुभा

- कमी कोरोनासंख्येची गावे सील करून इतरांना प्रवेशबंदी, गावांतर्गत व्यवहार सुरू

- तालुकास्तरावरही कमी रुग्णसंख्या असल्यास नाकेबंदी, तालुक्यांतर्गत व्यवहारांना मुभा

चौकट

तुम्ही जबाबदारी घेणार का?

एका बैठकीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लॉकडाऊनसाठी असा फॉर्म्युला मांडला असता, लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केल्याचे समजते. यातून परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदारी घेणार का, असा सवाल विचारण्यात आला, तेव्हा अधिकाऱ्याने शांत राहणे पसंत केले.

कोट

यापुढे लॉकडाऊन सहन करण्याची शक्ती उरलेली नाही. व्यापारी स्वत:हून दुकाने उघडण्याच्या मन:स्थितीत आहेत. रुग्णसंख्या कमी असणारी गावे, शहरे सील करून अंतर्गत व्यवहारांना परवानगीची मागणी आम्ही वारंवार केली आहे. महापालिका क्षेत्रातही अंतर्गत व्यवहार सुरू ठेवता येतील. ग्रामीण भागाच्या तुलनेने महापालिका क्षेत्रात फैलाव कमी आहे, त्यामुळे सांगली-मिरजेला वेठीस धरले जाऊ नये.

- समीर शहा, अध्यक्ष, व्यापारी संघटना

लॉकडाऊनमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. कमी रुग्ण असणारी गावे लॉकडाऊनमधून वगळावीत. तेथील सक्रिय रुग्णांसाठी दक्षता समित्या, पोलीस व आरोग्य यंत्रणेने काटेकोर नियोजन करावे. इतर व्यवहारांना परवानगी द्यावी. दोन-तीन टक्के रुग्णांसाठी शंभर टक्के गाव कोंडून ठेवणे व्यवहार्य नाही.

- महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

अनेक छोट्या गावांत कोरोनाचे रुग्ण नाममात्र आहेत. तेथील लॉकडाऊन शिथिल करावा. मोठ्या गावांतही रुग्णांचे कडक विलगीकरण करून इतर व्यवहारांना मुभा द्यावी. आणखी तग धरण्याची शक्ती शेतकरी व सर्वसामान्यांत राहिलेली नाही.

- तानाजी पाटील, सरपंच सलगरे