शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तेरा हजार रुग्णांसाठी जिल्ह्यातील ३२ लाख लोकसंख्या वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

सांगली : सव्वा वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी पुढे येत आहे. ज्या गावात ...

सांगली : सव्वा वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी पुढे येत आहे. ज्या गावात किंवा तालुक्यात रुग्णसंख्या जास्त असेल, तेथेच लॉकडाऊन सुरू ठेवावा, असा सूर उमटत आहे.

कमी रुग्णसंख्येच्या गावांत व तालुक्यांत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगीची मागणी होत आहे. कोरोनामुक्त गावेही सरसकट लॉकडाऊनमुळे भरडली जात आहेत. पहिल्या लाटेत शहरी भागात कोरोनाचा जोर असताना ग्रामीण भागही वेठीस धरला गेला. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना फोफावताना शहरी भागाची नाहक होरपळ सुरू आहे.

यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी विविध स्तरांतून होत आहे. जास्त रुग्णसंख्येच्या गावांत लॉकडाऊन ठेवून शेजारच्यांना सूट द्यावी, हाच निकष तालुक्यांनाही लावावा. कमी रुग्णसंख्येच्या तालुक्यांत लॉकडाऊन शिथिल करावा, सीमांची नाकाबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट

शिराळा, कडेगाव, पलूसमध्ये रुग्ण कमी, तरीही टाळेबंदीचे जोखड

दुसऱ्या लाटेत आटपाडी, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्यांत दररोजची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. खुद्द पलूस, शिराळा, कडेगाव, कवठेमहांकाळ या शहरांतही दररोजची रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी आहे. तरीही ते वेठीस धरले जात आहेत. तेथील सक्रिय रुग्णांना कडक विलगीकरणात ठेवून उर्वरित जनजीवन मोकळे करता येईल.

चौकट

असे करता येईल

- महापालिका क्षेत्रात घाऊक व किरकोळ व्यापार वेगवेगळ्या वेळेत

- जिल्हाभरातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी, जीवनावश्यक असल्यास परवानगी

- गावस्तरावरील कोरोनाग्रस्तांचे १०० टक्के विलगीकरण, उर्वरित व्यवहारांना मुभा

- कमी कोरोनासंख्येची गावे सील करून इतरांना प्रवेशबंदी, गावांतर्गत व्यवहार सुरू

- तालुकास्तरावरही कमी रुग्णसंख्या असल्यास नाकेबंदी, तालुक्यांतर्गत व्यवहारांना मुभा

चौकट

तुम्ही जबाबदारी घेणार का?

एका बैठकीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लॉकडाऊनसाठी असा फॉर्म्युला मांडला असता, लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केल्याचे समजते. यातून परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदारी घेणार का, असा सवाल विचारण्यात आला, तेव्हा अधिकाऱ्याने शांत राहणे पसंत केले.

कोट

यापुढे लॉकडाऊन सहन करण्याची शक्ती उरलेली नाही. व्यापारी स्वत:हून दुकाने उघडण्याच्या मन:स्थितीत आहेत. रुग्णसंख्या कमी असणारी गावे, शहरे सील करून अंतर्गत व्यवहारांना परवानगीची मागणी आम्ही वारंवार केली आहे. महापालिका क्षेत्रातही अंतर्गत व्यवहार सुरू ठेवता येतील. ग्रामीण भागाच्या तुलनेने महापालिका क्षेत्रात फैलाव कमी आहे, त्यामुळे सांगली-मिरजेला वेठीस धरले जाऊ नये.

- समीर शहा, अध्यक्ष, व्यापारी संघटना

लॉकडाऊनमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. कमी रुग्ण असणारी गावे लॉकडाऊनमधून वगळावीत. तेथील सक्रिय रुग्णांसाठी दक्षता समित्या, पोलीस व आरोग्य यंत्रणेने काटेकोर नियोजन करावे. इतर व्यवहारांना परवानगी द्यावी. दोन-तीन टक्के रुग्णांसाठी शंभर टक्के गाव कोंडून ठेवणे व्यवहार्य नाही.

- महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

अनेक छोट्या गावांत कोरोनाचे रुग्ण नाममात्र आहेत. तेथील लॉकडाऊन शिथिल करावा. मोठ्या गावांतही रुग्णांचे कडक विलगीकरण करून इतर व्यवहारांना मुभा द्यावी. आणखी तग धरण्याची शक्ती शेतकरी व सर्वसामान्यांत राहिलेली नाही.

- तानाजी पाटील, सरपंच सलगरे