शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जत तालुक्यातील डाळिंब बागायतदार अनुदानापासून वंचित

By admin | Updated: November 5, 2014 23:45 IST

उत्पादनात घट : शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना फटका; लागवडीत घट होण्याची शक्यता

गजानन पाटील -दरीबडची -शासनाने रोजगार हमी योजनेच्या अध्यादेशानुसार पाच एकरावरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी अट घातल्याने हजारो शेतकरी डाळिंब लागवड अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामुळे दुष्काळी भागातील डाळिंब लागवडीत घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र विधानसभेच्या घाईमुळे या प्रश्नाकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. राज्यातील महायुतीच्या शासनाने पाच एकराच्या अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.फळबाग लागवडीस कायम दुष्काळी जत तालुक्यातील जमीन, अनुकूल हवामान, ठिबक सिंचनाचा वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी फळबागा घेऊ लागला आहे. उजाड अशा माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. कमी लागवड खर्च, बाजारात उच्चांकी दर यामुळे जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांमध्ये नव्याने डाळिंब लागवड होत आहे. यापूर्वी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून १०० टक्के अनुदान योजनेतून प्रतिहेक्टर ४० हजार ५७० रुपये तीन वर्षात देण्यात येत होते. त्यामध्ये खड्डे खोदणे, भरणी, रोप खरेदी, रासायनिक खत, सेंद्रिय खत, औषध, बागेच्या चोहोबाजूंनी कंपाऊंड घालणे आदी कामांसाठी टप्प्या-टप्प्याने पैसे दिले जात होते. बाग किमान पाच वर्षे जिवंत ठेवण्याची अट होती. त्यासाठी कृषी सहाय्यकांकडे प्रस्ताव दिल्यानंतर शेतकऱ्यांना काहीच करावे लागत नसे. अनुदानाच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात होती. त्यामुळे डाळिंब लागवडीस चालना मिळत होती. ही योजना राबवत असताना शासनाने क्षेत्राबाबत कोणतीही अट घातली नव्हती. परंतु यावर्षी जत तालुक्यासाठी कृषी विभागाकडे ४० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते तुटपुंजे आहे. गेल्या शासनाने फळबागेसाठी अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतूद केली नाही. त्यामुळे अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. सध्या शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत फळबाग योजना राबवताना डाळिंबासाठी हेक्टरी १ लाख १० हजार अनुदान निश्चित केले आहे. या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत न करता रोजगार हमीच्या पद्धतीनेच करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेचा लाभ पाच एकराच्या आतीलच शेतकऱ्यांना देण्यात यावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे पाच एकरावरील शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. सध्याच्या योजनेतून लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला प्रथम ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. त्यानंतर त्यास तालुका कृषी अधिकारी तांत्रिक मंजुरी देतात. नंतर तहसीलदार यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर मजुरांच्या माध्यमातून सर्व कामे करण्याची सक्ती केली आहे. शासनाने २८ फेबु्रवारी २०१४ रोजी काढलेल्या आदेशानुसार, पाच एकरावरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी चुकीची अट घातली आहे. सरकारी आदेशामुळे शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. शासनाने ही योजना पूर्वीप्रमाणेच कृषी विभागाच्या माध्यमातून राबवावी ही शेतकऱ्यांची मागणी भाजपने मान्य करण्याची शेतकऱ्यांसाठी क्षेत्राची घातलेली रोजगार हमी योजनेतील पाच एकराची अट महायुतीच्या सरकारने कमी करावी, अशी मागणी होत आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडे जिरायत जमीन जास्त आहे. ते पाच एकराच्या अटीमध्ये बसत नाहीत. स्वखर्चाने बागा लावणे हे गरीब शेतकऱ्यांना शक्य नाही. म्हणून शासनाने ही अट रद्द करावी, अशी आमची मागणी आहे.- विलास शिंदे, डाळिंब शेतकरी