शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

वांगीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त...

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

अनुचित प्रकार नाही : पोलीस बंदोबस्तात कारवाई

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्यास वांगी ग्रामपंचायतीस अखेर यश आले आहे.अतिक्रमण हटविताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.वांगी येथे गट नं. ३३७ या शासनाच्या मालकीच्या जागेवर ४९४ चौरस मीटरमध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड यांनी पक्के घर बांधून जवळपास ४० वर्षांपासून अतिक्रमण केले होते, तर काही लोकांनी गावातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये ग्रामपंचायतीने गावातील सर्व अतिक्रमणधारकाना नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही लोकांनी अतिक्रमणे काढून घेतली होती; तर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीदेखील २८ फेबुवारी २०१४ रोजी हे अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पोलीस यंत्रणा बोलावून जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहायाने अतिक्रमण हटविले.यावेळी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, सरपंच मनीषा कांबळे, ग्रामसेवक विनायक गोवंडे, तलाठी संभाजी शिरतोडे आदी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिंचणी-वांगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)४० वर्षांपासूनचे अतिक्रमणवांगी येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्याची सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी २८ फेबुवारी रोजी ग्रामपंचायतीला दिली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने दि. २० रोजी जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी ही अतिक्रमणे हटविण्यात आली.