शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वांगीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त...

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

अनुचित प्रकार नाही : पोलीस बंदोबस्तात कारवाई

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्यास वांगी ग्रामपंचायतीस अखेर यश आले आहे.अतिक्रमण हटविताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.वांगी येथे गट नं. ३३७ या शासनाच्या मालकीच्या जागेवर ४९४ चौरस मीटरमध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड यांनी पक्के घर बांधून जवळपास ४० वर्षांपासून अतिक्रमण केले होते, तर काही लोकांनी गावातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये ग्रामपंचायतीने गावातील सर्व अतिक्रमणधारकाना नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही लोकांनी अतिक्रमणे काढून घेतली होती; तर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीदेखील २८ फेबुवारी २०१४ रोजी हे अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पोलीस यंत्रणा बोलावून जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहायाने अतिक्रमण हटविले.यावेळी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, सरपंच मनीषा कांबळे, ग्रामसेवक विनायक गोवंडे, तलाठी संभाजी शिरतोडे आदी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिंचणी-वांगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)४० वर्षांपासूनचे अतिक्रमणवांगी येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्याची सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी २८ फेबुवारी रोजी ग्रामपंचायतीला दिली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने दि. २० रोजी जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी ही अतिक्रमणे हटविण्यात आली.