शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कवठेमहांकाळमध्ये तलाव आटले

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर : पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ तलावांपैकी ७ तलावांतील पाणीसाठा येत्या आठवडाभरात आटण्याच्या मार्गावर असून, उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा १५ दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिलेला आहे. तसेच ९0 टक्के रब्बीची पेरणी झालेले क्षेत्र पाण्याअभावी व पावसाअभावी वाया जाणार आहे. तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येत्या १५ दिवसांनंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासन असो की, राजकीय प्रतिनिधी असोत, डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामानंतर किमान नोव्हेंबरपर्यंत तरी पाऊस येईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता आणि रब्बी हंगाम सुरळीत पार पडेल असे वाटत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेवीस हजार नऊशे सहासष्ट हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी एकवीस हजार पाचशे सत्त्याहत्तर हेक्टरवर रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल, करडई आदी गळीत धान्याची एकूण ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली. या रब्बी हंगामात पाऊस येईल अथवा ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. ना पाऊस आला, ना ‘म्हैसाळ’चे पाणी. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या अवस्थेत आला. तालुक्यात ११ तलावांतील जो उपलब्ध पाणीसाठा आहे, तोही १५ डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. यापैकी ७ तलावांतील पाणीसाठा पूर्णपणे गाळापर्यंत पोहोचला आहे; तर उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा फक्त १५ डिसेंबरपर्यंतच पुरेल इतका आहे. त्यामुळे हे उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठी उपयोगी पडणार आहे. याचा शेतीला काहीही उपयोग होणार नाही. तसेच म्हैसाळ योजनेचे १८ कोटी रुपये वीज बिल थकित असल्याने म्हैसाळ योजना ही सध्या बंद आहे. त्यामुळे वीज बिल भरल्याखेरीज म्हैसाळचे पाणी शेतीला मिळणार नाही. त्यामुळे रब्बी हंगामही तरणार नाही. एकूणच पाण्याअभावी शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.तलावक्षमता उपलब्ध पाणी कुची७९.0५८.६रायवाडी७६.६० ३२.१४ लांडगेवाडी ३७.0३१.0५लंगरपेठ ७८.३९११.८८नांगोळे४५.८५१७.८९बोरगाव५७.७११.७५दुधेभावी १४०.६३१५.0५ घोरपडी ५३.२७ 0.0४बंडगरवाडी ७२.६१३९.६८बसाप्पाचीवाडी २७४.५७ १८१.१४पाणी नाही : उत्पादन खर्च निघणेही कठीणयावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामही कसाबसा शेतकऱ्यांनी घेतला. खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी थोड्या प्रमाणात आले. परंतु ते बेभरवशाचे ठरले. नियमितपणे खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. साधा उत्पादन खर्चही खरीप हंगामात त्याला मिळू शकला नाही.