शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

कवठेमहांकाळमध्ये तलाव आटले

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर : पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ तलावांपैकी ७ तलावांतील पाणीसाठा येत्या आठवडाभरात आटण्याच्या मार्गावर असून, उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा १५ दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिलेला आहे. तसेच ९0 टक्के रब्बीची पेरणी झालेले क्षेत्र पाण्याअभावी व पावसाअभावी वाया जाणार आहे. तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येत्या १५ दिवसांनंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासन असो की, राजकीय प्रतिनिधी असोत, डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामानंतर किमान नोव्हेंबरपर्यंत तरी पाऊस येईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता आणि रब्बी हंगाम सुरळीत पार पडेल असे वाटत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेवीस हजार नऊशे सहासष्ट हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी एकवीस हजार पाचशे सत्त्याहत्तर हेक्टरवर रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल, करडई आदी गळीत धान्याची एकूण ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली. या रब्बी हंगामात पाऊस येईल अथवा ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. ना पाऊस आला, ना ‘म्हैसाळ’चे पाणी. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या अवस्थेत आला. तालुक्यात ११ तलावांतील जो उपलब्ध पाणीसाठा आहे, तोही १५ डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. यापैकी ७ तलावांतील पाणीसाठा पूर्णपणे गाळापर्यंत पोहोचला आहे; तर उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा फक्त १५ डिसेंबरपर्यंतच पुरेल इतका आहे. त्यामुळे हे उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठी उपयोगी पडणार आहे. याचा शेतीला काहीही उपयोग होणार नाही. तसेच म्हैसाळ योजनेचे १८ कोटी रुपये वीज बिल थकित असल्याने म्हैसाळ योजना ही सध्या बंद आहे. त्यामुळे वीज बिल भरल्याखेरीज म्हैसाळचे पाणी शेतीला मिळणार नाही. त्यामुळे रब्बी हंगामही तरणार नाही. एकूणच पाण्याअभावी शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.तलावक्षमता उपलब्ध पाणी कुची७९.0५८.६रायवाडी७६.६० ३२.१४ लांडगेवाडी ३७.0३१.0५लंगरपेठ ७८.३९११.८८नांगोळे४५.८५१७.८९बोरगाव५७.७११.७५दुधेभावी १४०.६३१५.0५ घोरपडी ५३.२७ 0.0४बंडगरवाडी ७२.६१३९.६८बसाप्पाचीवाडी २७४.५७ १८१.१४पाणी नाही : उत्पादन खर्च निघणेही कठीणयावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामही कसाबसा शेतकऱ्यांनी घेतला. खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी थोड्या प्रमाणात आले. परंतु ते बेभरवशाचे ठरले. नियमितपणे खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. साधा उत्पादन खर्चही खरीप हंगामात त्याला मिळू शकला नाही.