शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जतमध्ये डाळिंबाची सात कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेत तलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंबाच्या बागा उभ्या ...

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेत तलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत. डाळिंबाचे सौदे गेल्या महिन्यापासून बंद असल्यामुळे सात कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांंना आर्थिक फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सौद्याला परवानगी देऊनही सौदे बंद असल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १२ हजार २२१ एकर आहे. चागंला भाव मिळत असल्यामुळे केशर (भगवा) जातीच्या बागा अधिक आहेत. उमदी, दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, वाळेखिंडी, बेवणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, संख, निगडी बुद्रुक या परिसरात डाळिंब फळबागा आहेत. गेल्यावर्षी संख, दरीबडची, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी येथे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत. सध्या डाळिंब बागा काढणीस आल्या आहेत. कोरोनाचा संसर्गाचा फटका डाळिंब उत्पादकांना बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंबाचे सौदे सध्या बंद आहेत. जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाचे सौदे महिन्याभरापासून बंद आहेत. व्यापारी बागेतील काही फळे घेत नाहीत. अशी फळे शेतकरी तोडून घेऊन येत होता. याच शेतकऱ्याला फायदा झाला होता. सौद्याला दोन हजार क्रेट म्हणजे पन्नास टन डाळिंबाची आवक होते. भाव ३५ ते ८० रुपयेपर्यंत मिळत होता. डाळिंबाची ४० लाखांची उलाढाल होती. कामगारांना रोजगार मिळत होता. सध्या हे डाळिंबाचे सौदे महिनाभरापासून बंद असल्याने सात कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लाॅकडाऊन शिथिल केले आहे. फळ मार्केटला सवलती देऊनही जतमध्ये सौदे मंगळवारी बंदच होते.

चौकट

बाजारपेठा बंद

सध्या लॉकडाऊनमुळे बेंगलोर, चन्नई, कोलकाता, दिल्ली, कानपूर, विजयवाडा येथील मार्केट बंद आहेत. गतवेळीही कोरोनामुळे कवडीमोल दराने डाळिंब विकण्याची वेळ आली होती. यावर्षी तरी चांगला दर मिळेल या आशेपोटी शेतकरी तग धरून आहे.

कोट

डाळिंब सौदे बंद असल्याने पिकलेल्या मालाची अडचण झाली आहे. माल लवकर विकला नाही तर नुकसान होणार आहे. सौदे कोरोना नियम पाळून सुरू करावेत.

आप्पासाहेब चिकाटी, शेतकरी.

कोट

व्यापाऱ्यांकडून सौदे कधी सुरू होणार याबाबत विचारणा होत आहे. सौद्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र आलेले नाही. आदेश आले तर लवकरच सौदे सुरू होणार आहेत.

-एस. बी. चौधरी, सचिव, बाजार समिती, जत.