शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये डाळिंबाची सात कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेत तलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंबाच्या बागा उभ्या ...

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेत तलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत. डाळिंबाचे सौदे गेल्या महिन्यापासून बंद असल्यामुळे सात कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांंना आर्थिक फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सौद्याला परवानगी देऊनही सौदे बंद असल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १२ हजार २२१ एकर आहे. चागंला भाव मिळत असल्यामुळे केशर (भगवा) जातीच्या बागा अधिक आहेत. उमदी, दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, वाळेखिंडी, बेवणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, संख, निगडी बुद्रुक या परिसरात डाळिंब फळबागा आहेत. गेल्यावर्षी संख, दरीबडची, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी येथे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत. सध्या डाळिंब बागा काढणीस आल्या आहेत. कोरोनाचा संसर्गाचा फटका डाळिंब उत्पादकांना बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंबाचे सौदे सध्या बंद आहेत. जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाचे सौदे महिन्याभरापासून बंद आहेत. व्यापारी बागेतील काही फळे घेत नाहीत. अशी फळे शेतकरी तोडून घेऊन येत होता. याच शेतकऱ्याला फायदा झाला होता. सौद्याला दोन हजार क्रेट म्हणजे पन्नास टन डाळिंबाची आवक होते. भाव ३५ ते ८० रुपयेपर्यंत मिळत होता. डाळिंबाची ४० लाखांची उलाढाल होती. कामगारांना रोजगार मिळत होता. सध्या हे डाळिंबाचे सौदे महिनाभरापासून बंद असल्याने सात कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लाॅकडाऊन शिथिल केले आहे. फळ मार्केटला सवलती देऊनही जतमध्ये सौदे मंगळवारी बंदच होते.

चौकट

बाजारपेठा बंद

सध्या लॉकडाऊनमुळे बेंगलोर, चन्नई, कोलकाता, दिल्ली, कानपूर, विजयवाडा येथील मार्केट बंद आहेत. गतवेळीही कोरोनामुळे कवडीमोल दराने डाळिंब विकण्याची वेळ आली होती. यावर्षी तरी चांगला दर मिळेल या आशेपोटी शेतकरी तग धरून आहे.

कोट

डाळिंब सौदे बंद असल्याने पिकलेल्या मालाची अडचण झाली आहे. माल लवकर विकला नाही तर नुकसान होणार आहे. सौदे कोरोना नियम पाळून सुरू करावेत.

आप्पासाहेब चिकाटी, शेतकरी.

कोट

व्यापाऱ्यांकडून सौदे कधी सुरू होणार याबाबत विचारणा होत आहे. सौद्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र आलेले नाही. आदेश आले तर लवकरच सौदे सुरू होणार आहेत.

-एस. बी. चौधरी, सचिव, बाजार समिती, जत.