शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब बागायतदारांवर ‘संक्रांत’

By admin | Updated: December 8, 2015 00:44 IST

बाजारात कवडीमोल किंमत : चेन्नईतील पावसाचा मोठा फटका

गजानन पाटील -- संख--तमिळनाडू राज्यात झालेला मुसळधार अवकाळी पाऊस, उत्पादनातील वाढ यामुळे बाजारपेठेमध्ये डाळिंबाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. गंभीर दुष्काळी परिस्थिती, बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव, तीव्र पाणीटंचाई या प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या बागांतून डाळिंब विक्रीची सुरुवात झालेली असताना, दर कमी झालेला आहे. बागांसाठी महागडी औषधे, रासायनिक खते, तसेच शेणखताचा लागवडीसाठी उपयोग करून, मशागतीचा भरमसाट खर्च करून आणि अनेक अडचणींवर मात करून पिकविलेली डाळिंबे कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५८ हेक्टर आहे. कमी पाण्यात, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक आहे. शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहापुरती खरीप व रब्बी हंगामातील पिके घेऊन विहीर व कूपनलिकेमध्ये असलेल्या पाणीसाठ्यावर द्राक्षे, डाळिंब फळबागा लावल्या आहेत. द्राक्षबागेपेक्षा कमी खर्च येत असल्यामुळे शेतकरी डाळिंबाकडे वळला आहे. शंभर टक्के फळबाग अनुदान योजनेतून, ठिंबक सिंचन, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, आरक्ता, भगवा जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, मुचंडी येथील शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंब उत्पादन केले आहे. इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये ते उत्पादन घेत असल्यामुळे या शेतकऱ्यांनी बागा फुलविल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला झाला आहे. जून, जुलैमध्ये धरलेल्या बागांची डाळिंबे विक्रीयोग्य होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र बाजारपेठेत दर कमी झाले आहेत. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये भगवा केशर जातीच्या डाळिंबांचा सरासरी ९० ते १२० रुपये किलो दर होता. आॅक्टोबर महिन्यामध्ये भगवा जातीच्या डाळिंबांचा सरासरी १३० रुपये किलोपर्यंत दर गेला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दरात चढ-उतार सुरू आहे.चन्नई, हैदराबाद, बेंगलोर, नागपूर, दिल्ली, लखनौ या बाजारपेठांमध्ये दलाल, व्यापारी व फळबाग खरेदी-विक्री संघामार्फत माल पाठविला जातो. पण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने डाळिंबाची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या चन्नईत अवकाळी पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डाळिंबाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.गेल्या १५ दिवसांपासून गणेश डाळिंबाचा दर ३० ते ३५ रुपये किलो दर झाला आहे. केशर डाळिंबाचा दर ४५ ते ५५ रुपये किलो झाला आहे. सोलापूर, सांगोला, आटपाडी, सांगली, बाजार समितीच्या सौदे बाजारात क्वचितच गणेश डाळिंबाला ३२ रुपये, केशरला ४५ रुपये दर मिळतो. सध्या गणेश ३० रुपये, केशर ४२ रुपये, भगवा ४० रुपये असा सरासरी दर मिळत आहे.जूनमध्ये हंगाम धरलेल्या बागांची डाळिंब विक्री सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे दर नसल्याने शेतकऱ्यांनी फळांची तोडणी लांबवली आहे. पण येत्या १५ ते २० दिवसांत दर न वाढल्यास शेतकऱ्यांना मिळेल त्या भागात डाळिंब विक्री करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. व्यथा शेतकऱ्यांच्या...कष्टाने डाळिंब बागा वाढवल्या. महागडी औषधे, खते व मशागतीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. दर्जेदार उत्पादन करूनही अवकाळीने दर कमी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी, दरीबडची डाळिंबाची मोठी बाजारपेठ चेन्नई आहे. तेथे पाऊस असल्याने बाजारात आवक कमी असल्याने दर कमी झाला आहे. थोड्या दिवसांनी दरात वाढ होईल, अशी आशा वाटते.- चिदानंद कोळी, डाळिंब व्यापारीप्रश्न सध्याच्या दराचाडाळिंब जातआॅक्टो.-नोव्हेंबरचा दरसध्याचा दरगणेश४५ ते ५२ रुपये२५ ते ३२ रुपयेकेशर ९० ते ११० ४५ ते ५० भगवा १०० ते १३०५० ते ५५ कर्जाची परतफेड कशी होणारशेतकऱ्यांनी बागांवर सोसायटी, बॅँक, खासगी सावकाराचे कर्ज काढलेले आहे. पण दर कमी झाल्याने त्याची परतफेड कशी होणार? हा प्रश्न डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.