शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कृ ष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:06 IST

सांगली : जिल्ह्यातील शेकडो गावांतून दररोज पत्रात मिसळणारे कोट्यवधी लिटर सांडपाणी, जलपर्णी, शेवाळाचा थर, तसेच निर्माल्याच्या माध्यमातून निर्माण झालेला ...

सांगली : जिल्ह्यातील शेकडो गावांतून दररोज पत्रात मिसळणारे कोट्यवधी लिटर सांडपाणी, जलपर्णी, शेवाळाचा थर, तसेच निर्माल्याच्या माध्यमातून निर्माण झालेला कचरा अशा अनेक दुर्गंधीयुक्त गोष्टींना पोटात घेऊन वाहणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे.नदीकाठच्या अनेक गावांतील व शहरातील सांडपाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. केवळ एका सांगली शहरातून दररोज ५ कोटी लिटर सांडपाणी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढतच आहे. नदीच्या पाण्याचा वासही उग्र येत आहे. महापालिकेतर्फे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नदी पात्रातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले आहेत.कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करून जिल्ह्याबाहेर पडेपर्यंत शेकडो गावांचे सांडपाणी पोटात घेते. काही कारखान्यांचे केमिकलयुक्त व दूषित पाणी थेट नदीपात्रात येऊन मोठ्याप्रमाणात मिसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी, केंदाळ उगविले आहे. पाण्यावर हिरव्या रंगाचा प्रदूषित थर दिसत आहे.जनावरे धुणे, धार्मिक कार्यक्रमानंतर नदीत वस्तू विसर्जन करणे, विविध प्रकारचा कचरा टाकणे, निर्माल्य विसर्जित करणे यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. कृष्णा नदी स्वच्छतेबाबत बृहत् आराखडा तयार करण्याचे आदेशही निती आयोगाने दिले होते. जुलै २0१८ मध्ये याबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही या अहवालाचे घोडे अडलेलेच आहे. अहवालाची ही अवस्था, तर स्वच्छता कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.