शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

Lok Sabha Election 2019 सांगली, मिरज शहरातील मतदान युती-आघाडीला ठरणार भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:16 IST

अशोक डोंबाळे। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मोदी लाटेवर स्वार झालेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे जत, कवठेमहांकाळ, मिरज, ...

अशोक डोंबाळे।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मोदी लाटेवर स्वार झालेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे जत, कवठेमहांकाळ, मिरज, सांगलीतील मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे बालेकिल्ले असलेली सांगली, मिरज, जत ही शहरे महत्त्वाची, तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांची जत, उमदी, कवठेमहांकाळ शहरांवरच भिस्त आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणाच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक झाला होता. लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्मासह आरक्षणाची मागणीही तेवढीच महत्त्वाची होती. यामुळे काँग्रेसविरोधात प्रचंड असंतोष होता. बेरोजगारी हटाव आणि शेतीला हमीभाव देण्याची आश्वासने देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली. या मोदी लाटेतच सांगली लोकसभेच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून संजय पाटील यांच्या रूपाने कमळ फुलले. पाच वर्षांत प्रचंड घडामोडी घडल्या. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, धनगर, मुस्लिम समाजाचे आरक्षण आणि लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीकडे भाजप सरकारने ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे गतवेळी मताधिक्य देणाऱ्या उमदी, संख, जत, कवठेमहांकाळ, मिरज, मालगाव, सांगली, माधवनगर या हक्काच्या मतदारसंघात मताधिक्य टिकविण्याचे फार मोठे आव्हान संजय पाटील त्यांच्यासमोर असणार आहे. भाजपमधील असंतोषासह मागील निवडणुकीतील त्यांचे स्टार प्रचारक धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.भाजप विरोधातील असंतोषाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील सज्ज झाले आहेत. जत, उमदी, संख, कवठेमहांकाळ, मालगाव, मिरज, सांगलीतील दादाप्रेमी तरुणांसह वयोवृध्दांच्या भेटी घेऊन बालेकिल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टींनी भक्कम पाठबळ दिले आहे. जत, उमदीमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर त्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहे. सांगली, मिरज, मालगाव, माधवनगरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची फौजही त्यांच्या कामी येताना दिसत आहे.गोपीचंद पडळकर हेही मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासह लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीबाबत भाजपकडून कशी फसवणूक झाली, हे मांडत आहेत. धनगर आणि दलित, ओबीसी मतदारांवर त्यांची मोठी भिस्त आहे. जत, उमदी, संख, कवठेमहांकाळ शहरावर त्यांची भिस्त आहे.संजयकाका पाटील : २०१४ च्या निवडणुकीत त्यांना सांगली, जत, मिरज शहरातून मोठे मताधिक्य होते. आताही पहिल्या क्रमांकाची मते मिळावीत, ही त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. होमग्राऊंड तासगाव शहर आणि तालुक्याकडून त्यांची मोठी अपेक्षा असेलविशाल पाटील : सांगली, मिरज, भोसे, मालगाव येथील एकगठ्ठा मतांवर लक्ष असेल. कवठेमहांकाळ, जत मधील दादाप्रेमी गटही रिचार्ज केला आहे. पलूसमधील भिलवडी, अंकलखोप या मोठ्या गावांमधील वसंतदादा कारखान्याचे सभासद, संचालकांवर मदार असेल.गोपीचंद पडळकर : होमग्राऊंड आटपाडी तालुक्यातील खरसुंडी, झरे, करगणी परिसरावर भिस्त असेल. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे कवठेमहांकाळ, जत, मिरज, आटपाडी तालुक्यातील धनगर, दलित, मुस्लिम, ओबीसीच्या एकगठ्ठा मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक