शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राजकारणात गाळेधारकांचा बळी--कुशवाह यांना साकडे

By admin | Updated: November 16, 2014 23:50 IST

विट्यातील स्थिती : व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ : अनामत भरूनही गाळे सील

दिलीप मोहिते --विटा --विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात नव्याने बांधलेल्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे सध्या सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सापडल्याने गाळेधारकांचा नाहक बळी गेला आहे. गेल्या ५० वर्षांपासूनच्या जुन्या खोकीधारकांनी पालिका प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून दुकाने काढून घेतली. आता नव्या इमारतीतील गाळ्यांची पालिकेने सांगितलेली अनामत रक्कम भरूनही राजकीय वादामुळे ही न्यायप्रविष्ट बाब झाल्याने गाळे सील करावे लागले. त्यामुळे गाळेधारकांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.विटा येथील शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून लाकडी खोकी होती. त्या खोक्यात व्यापारी व्यवसाय करीत होते. कालांतराने शहराच्या मुख्य चौकातच पालिकेने नवीन शॉपिंग सेंटर उभारून त्यात खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचे अभिवचन दिले. त्यामुळे खोकीधारकांनी स्वखर्चाने आपली दुकाने काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य केले. दोन-तीन वर्षात याठिकाणी टोलेजंग व्यापारी संकुल उभारले. संकुलात जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचा शब्द पाळण्याचे ठरविले.त्यानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे अनामत रक्कम जमा करून घेऊन ३१ खोकीधारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, तेथूनच राजकीय वादाला सुरूवात झाली. विरोधी नगरसेवक, नागरी हक्क संघटना व सत्ताधारी यांचा राजकीय संघर्ष पुणे आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला.त्यात नागरी हक्क संघटना व विरोधी नगरसेवकांनी गाळेवाटप प्रक्रियेला स्थगिती मिळविली. त्यामुळे अनामत रकमा भरून घेऊन जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने वाटप झालेले गाळे सील करण्यात आले. विरोधकांना आनंद झाला पण, व्यापाऱ्यांची दुकाने सील होऊन त्यांची रोजीरोटी बंद झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. विटा शहरात सध्या विरोधक, सत्ताधारी व आता गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जन्माला आलेल्या नागरी हक्क संघटना पालिकेच्या राजकीय पटलावर चांगलीच तापली आहे. त्यांच्यातील राजकीय साठमारी व वादात मात्र व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. पालिकेने सांगितलेली वाढीव अनामत रक्कम भरूनही आमचे गाळे सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सीलबंद झाले आहेत. त्यामुळे आम्हा व्यापाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यात गाळेधारक व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे यातून योग्य तो तोडगा काढून आम्हा व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून त्या जागेवर व्यवसाय करणारे जुने व्यापारी संपत कांबळे, किरण भिंगारदेवे, धोंडिराम पवार, सुरेश शिंगे, अमोल आहुजा, शंकर सीताराम सकट, शिवराम पवार व सुशिला कोरडे या नऊ व्यापाऱ्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला आहे.