शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

राजकारणात गाळेधारकांचा बळी--कुशवाह यांना साकडे

By admin | Updated: November 16, 2014 23:50 IST

विट्यातील स्थिती : व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ : अनामत भरूनही गाळे सील

दिलीप मोहिते --विटा --विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात नव्याने बांधलेल्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे सध्या सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सापडल्याने गाळेधारकांचा नाहक बळी गेला आहे. गेल्या ५० वर्षांपासूनच्या जुन्या खोकीधारकांनी पालिका प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून दुकाने काढून घेतली. आता नव्या इमारतीतील गाळ्यांची पालिकेने सांगितलेली अनामत रक्कम भरूनही राजकीय वादामुळे ही न्यायप्रविष्ट बाब झाल्याने गाळे सील करावे लागले. त्यामुळे गाळेधारकांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.विटा येथील शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून लाकडी खोकी होती. त्या खोक्यात व्यापारी व्यवसाय करीत होते. कालांतराने शहराच्या मुख्य चौकातच पालिकेने नवीन शॉपिंग सेंटर उभारून त्यात खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचे अभिवचन दिले. त्यामुळे खोकीधारकांनी स्वखर्चाने आपली दुकाने काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य केले. दोन-तीन वर्षात याठिकाणी टोलेजंग व्यापारी संकुल उभारले. संकुलात जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचा शब्द पाळण्याचे ठरविले.त्यानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे अनामत रक्कम जमा करून घेऊन ३१ खोकीधारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, तेथूनच राजकीय वादाला सुरूवात झाली. विरोधी नगरसेवक, नागरी हक्क संघटना व सत्ताधारी यांचा राजकीय संघर्ष पुणे आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला.त्यात नागरी हक्क संघटना व विरोधी नगरसेवकांनी गाळेवाटप प्रक्रियेला स्थगिती मिळविली. त्यामुळे अनामत रकमा भरून घेऊन जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने वाटप झालेले गाळे सील करण्यात आले. विरोधकांना आनंद झाला पण, व्यापाऱ्यांची दुकाने सील होऊन त्यांची रोजीरोटी बंद झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. विटा शहरात सध्या विरोधक, सत्ताधारी व आता गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जन्माला आलेल्या नागरी हक्क संघटना पालिकेच्या राजकीय पटलावर चांगलीच तापली आहे. त्यांच्यातील राजकीय साठमारी व वादात मात्र व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. पालिकेने सांगितलेली वाढीव अनामत रक्कम भरूनही आमचे गाळे सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सीलबंद झाले आहेत. त्यामुळे आम्हा व्यापाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यात गाळेधारक व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे यातून योग्य तो तोडगा काढून आम्हा व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून त्या जागेवर व्यवसाय करणारे जुने व्यापारी संपत कांबळे, किरण भिंगारदेवे, धोंडिराम पवार, सुरेश शिंगे, अमोल आहुजा, शंकर सीताराम सकट, शिवराम पवार व सुशिला कोरडे या नऊ व्यापाऱ्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला आहे.