शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

इस्लामपुरातील गाळे लिलाव प्रक्रियेवरून राजकीय गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST

इस्लामपूर : शहरातील पालिकेच्या विविध व्यापारी संकुलांतील २६३ गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेवरून राजकीय गदारोळ माजला आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी कसरत ...

इस्लामपूर : शहरातील पालिकेच्या विविध व्यापारी संकुलांतील २६३ गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेवरून राजकीय गदारोळ माजला आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी कसरत सुरू आहे. राष्ट्रवादीने गाळ्यांच्या फेरमूल्यांकनाचा आग्रह धरत सप्टेंबर १९ च्या शासन अधिसूचनेनुसार लिलाव घ्यावेत, अशी मागणी केली, तर संघर्ष समितीने ई-लिलाव पद्धतीला विरोध करत स्थानिकांना प्राधान्य देत घोषित केल्याप्रमाणे जाहीर लिलाव घ्यावा, अशी मागणी केली आहे.

संघर्ष समितीने मुख्याधिकारी दालनासमोर आंदोलन केले. शाकिर तांबोळी, विजय पवार यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले. पूर्वी जाहीर केलेली प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश आहेत का? लिलाव प्रक्रिया रद्द होण्याला कोण जबाबदार आहे अशा प्रश्नांची सरबत्ती केली.

तांबोळी म्हणाले, ई-लिलाव पद्धतीमध्ये मूळ आणि स्थानिक गाळेधारकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया जाहीर लिलाव अशीच व्हावी. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार, दिव्यांग, अनुसूचित जाती,भटक्या जमाती आणि शासन निर्णयानुसार गाळे आरक्षित ठेवून इतर गाळ्यांचा जाहीर लिलाव घ्यावा. ई-लिलाव पद्धतीला आमचा तीव्र विरोध असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गाळे इमारतीचे फेरमूल्यांकन व्हावे यासह अनामत आणि भाडे ठरविण्याच्या निकषात त्रुटी आहेत. तळघरात पाणी साठणाऱ्या गाळ्याना जादा अनामत तर वरच्या मजल्याला कमी अशी तफावत आहे. नऊ वर्षे पूर्ण न झालेल्या गाळ्यांचा फेरलिलाव काढण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविड, महापूर, अतिवृष्टी यामुळे व्यवसाय बंद आहेत असे मुद्दे मांडत नगरविकास विभागाच्या २० सप्टेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली आहे.

यावेळी शहाजी पाटील, संजय कोरे, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, संग्राम पाटील व नगरसेवक उपस्थित होते.

वसुली विभागाला नोटीस

प्रभारी मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी पूर्वी प्रसिद्ध केलेल्या लिलाव नोटीसमध्ये ई-लिलाव पद्धतीचा उल्लेख का केला नाही? असा ठपका ठेवत वसुली विभागाचे अरुण घोंगडे यांना यासंदर्भात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. या एकाच तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.