शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील गाळे लिलाव प्रक्रियेवरून राजकीय गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST

इस्लामपूर : शहरातील पालिकेच्या विविध व्यापारी संकुलांतील २६३ गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेवरून राजकीय गदारोळ माजला आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी कसरत ...

इस्लामपूर : शहरातील पालिकेच्या विविध व्यापारी संकुलांतील २६३ गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेवरून राजकीय गदारोळ माजला आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी कसरत सुरू आहे. राष्ट्रवादीने गाळ्यांच्या फेरमूल्यांकनाचा आग्रह धरत सप्टेंबर १९ च्या शासन अधिसूचनेनुसार लिलाव घ्यावेत, अशी मागणी केली, तर संघर्ष समितीने ई-लिलाव पद्धतीला विरोध करत स्थानिकांना प्राधान्य देत घोषित केल्याप्रमाणे जाहीर लिलाव घ्यावा, अशी मागणी केली आहे.

संघर्ष समितीने मुख्याधिकारी दालनासमोर आंदोलन केले. शाकिर तांबोळी, विजय पवार यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले. पूर्वी जाहीर केलेली प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश आहेत का? लिलाव प्रक्रिया रद्द होण्याला कोण जबाबदार आहे अशा प्रश्नांची सरबत्ती केली.

तांबोळी म्हणाले, ई-लिलाव पद्धतीमध्ये मूळ आणि स्थानिक गाळेधारकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया जाहीर लिलाव अशीच व्हावी. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार, दिव्यांग, अनुसूचित जाती,भटक्या जमाती आणि शासन निर्णयानुसार गाळे आरक्षित ठेवून इतर गाळ्यांचा जाहीर लिलाव घ्यावा. ई-लिलाव पद्धतीला आमचा तीव्र विरोध असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गाळे इमारतीचे फेरमूल्यांकन व्हावे यासह अनामत आणि भाडे ठरविण्याच्या निकषात त्रुटी आहेत. तळघरात पाणी साठणाऱ्या गाळ्याना जादा अनामत तर वरच्या मजल्याला कमी अशी तफावत आहे. नऊ वर्षे पूर्ण न झालेल्या गाळ्यांचा फेरलिलाव काढण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविड, महापूर, अतिवृष्टी यामुळे व्यवसाय बंद आहेत असे मुद्दे मांडत नगरविकास विभागाच्या २० सप्टेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली आहे.

यावेळी शहाजी पाटील, संजय कोरे, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, संग्राम पाटील व नगरसेवक उपस्थित होते.

वसुली विभागाला नोटीस

प्रभारी मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी पूर्वी प्रसिद्ध केलेल्या लिलाव नोटीसमध्ये ई-लिलाव पद्धतीचा उल्लेख का केला नाही? असा ठपका ठेवत वसुली विभागाचे अरुण घोंगडे यांना यासंदर्भात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. या एकाच तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.