शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

कवठेएकंद ग्रामपंचायतीमध्ये राजकीय वातावरण तापले

By admin | Updated: October 9, 2015 00:46 IST

निवडणुकांकडे लक्ष : लढत तिरंगी होण्याची शक्यता

प्रदीप पोतदार - कवठेएकंद---ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे कवठेएकंद (ता. तासगाव) येथे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आजवरच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये रंगल्या आहेत. आता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर खा. संजय पाटील यांच्या गटाला अधिकच बळ मिळाले असून, यानिमित्ताने प्रथमच भाजप आपली किस्मत अजमावणार आहे.तालुक्यातील माजी गृहमंत्री आर. आर. पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेस व खा. संजय पाटील यांचा गट भाजपच्या रुपाने आमने-सामने बहुतांशी गावांमध्ये लढणार आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथेच मात्र शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत असल्याने तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.ग्रामपंचायतीच्या आजवरच्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अधिकच पारडे जड राहिले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गतवेळी पारडे जड होते. परंतु यावेळी दोन सदस्यांनी भाजपकडे कौल दिल्याने काही काळासाठी शेकापला सरपंचपद द्यावे लागले आहे.सध्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेकाप व राष्ट्रवादीने आपल्या स्वबळाचा पवित्रा स्पष्ट केला आहे., तर नव्याने रिंगणात उतरणाऱ्या भाजपने स्वबळाची घोषणा करुन ‘हम भी कुछ कम नहीं’ असा संकेत दिला आहे. ज्या-त्या पक्षाने आपापल्या उमेदवारांची चाचपणी केली आहे, तर काहींनी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे अनेक प्रभागात वेगवेगळे परिणाम दिसणार आहेत, तर पहिल्यांदाच त्रिशंकू निवडणुकीमुळे वेगळे परिणाम जाणवणार असल्याचे भाकीत जाणकारांतून व्यक्त होत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपची प्रथमच एन्ट्रीलोकसभेच्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीत आजवर कधीही न दिसलेले कमळ फुलविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. खा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणुकीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी यांच्या सत्तासंघर्षात भाजपची प्रथमच एन्ट्री होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.भाजपपाठोपाठ शेकाप व राष्ट्रवादीची पुरेपूर तयारी चालली असल्याने निवडणुकांच्या तारखांप्रमाणे अधिकच रंगत वाढणार आहे. याची उत्सुकता ग्रामस्थांत आहे.पक्षाने आपापल्या उमेदवारांची चाचपणी केली आहे, तर काहींनी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे अनेक प्रभागात वेगवेगळे परिणाम दिसणार आहेत.