शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, गुंडांच्या जीवावर महाआघाडीचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पोलीस व गुंडांच्या जीवावर राज्यातील महाआघाडीच्या सरकारचा कारभार सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पोलीस व गुंडांच्या जीवावर राज्यातील महाआघाडीच्या सरकारचा कारभार सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे. त्या विरोधात जिल्ह्यात वकिलांची फौज उभी करा. दडपशाहीला आक्रमक प्रत्युत्तर द्या, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना दिले.

शहरातील विजयनगर येथे भाजप जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, निशिकांत पाटील, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, सर्वच जिल्ह्यात भाजपने पक्ष कार्यालयासाठी जागा घेतली आहे. पक्षाचे कामकाज पक्ष कार्यालयातून चालावे, अशी नेत्यांची भूमिका आहे. हे कार्यालय आपुलकीचे केंद्र बनावे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न कार्यालयातून सोडविले जावेत. राज्यातील ठाकरे सरकारने इतिहासात पहिल्यांदाच सर्वपक्षियांची बैठक घेतली आहे. ओबीसी आरक्षणावर भाजपने आवाज उठविल्याने सरकारला जाग आली. मराठा आरक्षण, महापूर, कोरोना यावर कधीच बैठक घेतली नाही. सरकार गुंड व पोलिसांच्या साहाय्याने सुरू आहे. अनिल देशमुख प्रकरणात शेवटी कागदपत्रे देण्याची तयारी दाखवावी लागली. सरकारचे चुकीचे सल्लागार कोण आहेत, हेच समजत नाही. कार्यकर्त्यांवर खटले दाखल होत आहेत. कार्यकर्त्यांच्या मागे वकिलांची फौज उभी करा. महाआघाडीतील तीनही पक्ष शेवटची फडफड करीत आहे.

पृथ्वीराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डाॅ. रवींद्र आरळी, तमन्नगौडा रवी पाटील, राजाराम गरुड, नीता केळकर, भारती दिगडे, गौतम पवार, जयराज पाटील, सुरेश आवटी, युवराज बावडेकर, संगीता खोत, निरंजन आवटी उपस्थित होते.

चौकट

भाजपला कुबड्यांची गरज नाही : देशमुख

पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, पक्ष कार्यालयासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी वास्तू उपलब्ध करून दिली. या कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार बसून लोकांचे प्रश्न सोडवतील. जिल्ह्यात भाजप भक्कम आहे. एखादा नेता पक्ष सोडून गेला तरी फारसा फरक पडणार नाही. येणाऱ्या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. कोणाच्या कुबड्यांची गरज नाही.