शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मिरजेत अरब नागरिकांवर पोलिसांची नजर

By admin | Updated: December 30, 2015 00:34 IST

पोलिसांच्या सूचना : शहरातील सर्वच लॉज, रुग्णालये, तसेच एजंटांना नोंदणी करण्याची सक्ती

मिरज : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या धोक्यामुळे आखाती देशांतून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांच्या आगमनावर पोलिसांची नजर आहे. वैद्यकीय उपचाराच्या कारणासाठी मिरजेत येणाऱ्या अरबांच्या नोंदणीची लॉजसह रुग्णालये व एजंटांवरही सक्ती करण्यात आली आहे. व्हिसाची मुदत संपलेल्या अरबांना परत पाठविण्यात येत आहे. मिरजेत वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब मिरजेत येतात. तृतीय व चतुर्थश्रेणी कामगार किंवा छोटे व्यावसायिक अरब मिरजेत व श्रीमंत उच्चशिक्षित अरब भारतात मुंबई, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरात जातात. एकेकाळी हजारोच्या संख्येने मिरजेत येणाऱ्या अरबांची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे रोडावली आहे. मात्र गेल्या दोन वर्षात अरब पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटक म्हणून आलेल्या अरबांनी मिरजेत वेगळ्या हालचाली करू नयेत, यासाठी पोलीस यंत्रणेने त्यांच्या येण्या-जाण्याच्या नोंदी घेण्यास सुरूवात केली आहे. १९८० पासून पर्यटन व उपचाराच्या कारणासाठी अरब मिरजेत येत आहेत. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉज सुरू आहेत. आॅक्टोबर ते फेब्रुवारी या हंगामात अरब मोठ्या संख्येने मिरजेत येतात. या अरबांना मिरजेत सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत. अरबांच्या संपर्कामुळे लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वजण अरबी बोलतात. मिरजेत यापूर्वी हजारो अरब येत असल्याने लॉजसह काही रुग्णालयांचे फलकही अरबी भाषेत झळकत होते. अरब पर्यटकांमुळे मिरजेतील व्यवसाय, उद्योगांना आधार मिळाला. मात्र त्यातून गैरप्रकार सुरू झाले. स्वस्तात मौजमजेसाठी मिरजेकडे येणाऱ्या अरब पर्यटकांच्या गैरवर्तणुकीविरूध्द ३० वर्षापूर्वी मिरजेत अरब हटाव आंदोलन झाले होते. यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी होऊन अरब पर्यटक हैदराबाद व बेंगलोरकडे वळले. मात्र आता पुन्हा एकदा मिरजेत अरब पर्यटक येत असल्याने इराक, सिरियातील दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने येणाऱ्या-जाणाऱ्या अरबांच्या नोंदी सुरू केल्या आहेत. एजंटांकडून संशयित अरबांच्या हालचालींची माहिती घेण्यात येत आहे. यापूर्वी केवळ लॉजवर येणाऱ्या अरबांची जिल्हा विशेष शाखेकडे नोंद करण्यात येत होती. मात्र आता एजंटांकडे किंवा उपचारासाठी रुग्णालयात वास्तव्य करणाऱ्या अरबांचीही नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्हिसा संपलेल्या अरबांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात येत आहे. (वार्ताहर)मौल्यवान वस्तू : संघर्षास कारणीभूतअरबांच्या आगमनाची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत नोंद होते. गतवर्षी मिरजेत सुमारे ३५० अरबांचे आगमन झाले. मात्र त्यापैकी मध्य पूर्वेतील देशांतील कोणीही अरब नसल्याची माहिती मिळाली. अरब येताना सोबत सोने, मौल्यवान वस्तू घेऊन येत असल्याने, या कारणावरून संघर्ष होऊन मिरजेत यापूर्वी एजंटांच्या खुनाच्या घटना घडल्या आहेत.हवालाबाबत पोलिसांना संशय...पर्यटक म्हणून येणाऱ्या अरबांमार्फत आखाती देशांतून भारतात रोख रक्कम पाठविण्याचा उद्योग हवाला एजंटांमार्फत होत असल्याची चर्चा आहे. आता अरब नागरिक पोलिसांच्या रडारवर आहेत.