शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कवितेला आयुष्यातून वजा करणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे काव्यवाचन करताना डॉ. राहुल गौर, सूूर्यकांत शिंदे, ज्ञानेश्वरी पाटील. लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : ...

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे काव्यवाचन करताना डॉ. राहुल गौर, सूूर्यकांत शिंदे, ज्ञानेश्वरी पाटील.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : संगीत आयुष्याचा सुखात आणि दु:खात नेहमी सोबत करते. संगीताशिवाय आयुष्य व्यर्थ आहे. कवितेला आयुष्यातून वजा करून आयुष्य बनूच शकत नाही, कविता हे जगण्याचे गाणे बनवले पाहिजे, असे मत डॉ. राहुल गौर यांनी व्यक्त केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत पाचव्या समारोपाच्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘कविता व काव्यावर शतदा प्रेम करावे’ या काव्य वाचन कार्यक्रमात कवींनी आपल्या रचना सादर केल्या. कवी ईलाही जमादार यांच्या कवितांना देखील कवींनी उजाळा देऊन त्यांना एक अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी कवी रवी बावडेकर, डॉ. राहुल गौर, ज्ञानेश्वरी पाटील, धर्मवीर पाटील, सूर्यकांत शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने काव्यमैफील रंगतदार बनवली. अध्यक्षस्थानी राजारामबापू बँकेचे संचालक संभाजीराव पाटील होते.

संभाजीराव पाटील म्हणाले, एका बाजूला लोक पुस्तक वाचनापासून दूर जात असताना जय किसानने ३२ वर्षे ही व्याख्यानमाला चालवली हे कौतुकास्पद आहे. ऑनलाइन माध्यमातून देखील व्याख्यानमाला चालवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली, उद्या आपल्या भागातील एक वैचारिक व्यासपीठ म्हणून जय किसानची ओळख होईल. यावेळी कादंबरीकार दि. बा. पाटील, शंकरराव चव्हाण, जि. प. सदस्या राजश्री एटम, मंडळाचे संस्थापक पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी उपस्थित होते. कालिदास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक यांनी केले. प्रा. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक शंकर पाटील यांनी आभार मानले.