शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

कविता आणि माणसांवर प्रेम करणारा कवी हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

कडेगाव येथील अंधकवी चंद्रकांत देशमुखे तथा बाबूजी यांचे नुकतेच निधन झाले. राज्यातील विविध मान्यवर साहित्यिकांनी बाबूजी हे कविता ...

कडेगाव येथील अंधकवी चंद्रकांत देशमुखे तथा बाबूजी यांचे नुकतेच निधन झाले. राज्यातील विविध मान्यवर साहित्यिकांनी बाबूजी हे कविता आणि माणसांवर प्रेम करणारे कवी होते, त्यांनी दिलेला चारित्र्याचा गंध जपून ठेवावा, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली.

खानापूर-कडेगाव साहित्य परिषद, ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ (बलवडी, भा.), यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी (देवराष्ट्रे) या संस्थांच्यावतीने बाबूजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन शोकसभा झाली. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, बेळगाव, बीड आदी जिल्ह्यांतील साहित्यिक सहभागी झाले होते.

बेळगाव येथील राणी चन्नमा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद गायकवाड म्हणाले, कवितासंग्रह नसतानाही बाबूजी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात प्रसिध्द होते. आधुनिक काळातील ते संत होते.

प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, बाबूजी मराठीतील राष्ट्रीय पातळीवरील कवी होते.

प्रा. डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, ते काळजाला भिडणारे कवी होते. प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) म्हणाले, माणसे जोडणे हा बाबूजींच्या जगण्याचा स्थायीभाव होता. त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा बाबूजींचे साहित्य प्रकाशित करण्याची जबाबदारी उचलणार असल्याचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी सांगितले.

डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम यांच्याशी बाबूजींचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या आयुष्यातला चांगला मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त करतानाच जितेश कदम भावुक झाले.

डॉ. रामचंद्र देखणे, ॲड. सुभाष पाटील, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सत्यप्रेम लगड (परळी ), भीमराव धुळूबुळू, दयासागर बन्ने, बाबा परीट, संदीप नाझरे, बाबा परीट, संदीप नाझरे, अभिजित पाटील, समाधान पोरे, रमजान मुल्ला, हिंमत पाटील, धर्मेंद्र पवार, विजय मांडके, संपत मोरे, सुनंदा शेळके, नीलम माणगावे, निलांबरी शिर्के आदींनी श्रद्धांजली वाहिली.

सतीश लोखंडे, दीपक पवार, दत्तात्रय सपकाळ यांनी संयोजन केले.

चौकट :

बाबूजींचा कवितासंग्रह दमसा प्रकाशित करणार

अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांचा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची जबाबदारी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा उचलणार असल्याचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी घोषित केले.