शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

वसगडे-ब्रह्मनाळ रस्त्याची पावसामुळे दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : पलूस तालुक्यातील वसगडे ते ब्रह्मनाळदरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याची दुर्दशा झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी

: पलूस तालुक्यातील वसगडे ते ब्रह्मनाळदरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वसगडे-खटाव ते ब्रह्मनाळ असा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे.

वसगडे येथील पाण्याची टाकी ते बिरोबा मंदिरापर्यंत जागोजागी

खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी गुडघाभर खोलीचे खड्डे आहेत. महावितरणच्या खटाव येथील सबस्टेशनजवळ गटारीची सोय नसल्याने शेतामध्ये साचलेले पाणी रस्त्यावर येत आहे.

पावसाचे पाणी साचून राहिल्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढून ती रस्त्यावर आलेली आहेत. कधीतरी एकेरी वाहतूक सुरू असते.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पलूस यांच्या अखत्यारित येतो.

सुखवाडी, ब्रह्मनाळ, खटाव या गावांना सांगली तसेच तासगाव, पाचव्या मैलाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. २०१९ रोजी कृष्णेला आलेल्या महापुरापासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. ब्रह्मनाळमध्ये बोट दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी या परिसराच्या विकासासाठी मोठमोठ्या आश्वासनांची खैरात केली होती. हा रस्ता यापूर्वी मंजूर आहे, असे सांगितले जात होते. हा रस्ता पुन्हा एकदा जिल्हा नियोजनमधून मंजूर झाला असल्याची चर्चा आहे. पण प्रत्यक्षात या ठिकाणी कोणताच बदल झालेला नाही. कुणाला घ्यायचे त्याला श्रेय घेऊ द्यावे. परंतु मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावरचे खड्डे तरी मुजवून घ्यावे व दोन्ही बाजूला वाढलेली काटेरी झुडपे काढून घ्यावी, नागरिकांची सोय करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली आहे.