शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कामाची स्थिती तपासूनच अनामत परत द्या: संग्रामसिंह देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:52 IST

सांगली : जिल्हा परिषदेकडील काही ठेकेदार अतिशय कमी दराने निविदा दाखल करतात. त्यातून निकृट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरसकट ठेकेदारांना चोवीस महिन्यांनी देण्यात येणारी अनामत रक्कम कामांची स्थिती तपासल्याशिवाय देऊ नका, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी दिले.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक ...

सांगली : जिल्हा परिषदेकडील काही ठेकेदार अतिशय कमी दराने निविदा दाखल करतात. त्यातून निकृट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरसकट ठेकेदारांना चोवीस महिन्यांनी देण्यात येणारी अनामत रक्कम कामांची स्थिती तपासल्याशिवाय देऊ नका, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी दिले.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, ब्रम्हानंद पडळकर, प्रा. सुषमा नायकवडी, तम्मणगौडा रवी-पाटील, अर्जुन पाटील, डी. के. पाटील, नितीन नवले, सुनीता पवार, अश्विनी पाटील उपस्थित होते.ठेकेदारांकडून निविदा भरताना दहा टक्के अनामत रक्कम घेण्यात येते. काम पूर्ण झाल्यानंतर चोवीस महिन्यांनंतर ही रक्कम संबंधित ठेकेदारांना परत देण्यात येते. काही ठेकेदार कमी दराच्या निविदा टाकून ठेका मिळवितात व संबंधित काम चांगल्या दर्जाचे करीत नाहीत. त्यामुळे सरसकट ठेकेदारांच्या अनामत रकमा देताना कामांची स्थिती बघूनच देण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या.ग्रामपंचायतीकडील निधी खर्ची पडत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत मांडल्या होत्या. मात्र नियोजनच्या निधीची परिस्थिती वेगळी नसल्याचे सदस्यांनी सभेत सांगितले. त्यावर जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त असणारा २०१६-१७ मधील अखर्चित निधी डिसेंबर २०१८ पूर्वी शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बांधकाम विभागाला रस्त्यांचा विशेष दुरूस्ती निधी ग्रामविकास निधीकडून येण्यासाठी बराच विलंब लागतो, त्यामुळे तो निधी पूर्वीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वितरित करण्यासाठी शासनाकडे विनंती प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.अंगणवाडी किंवा शाळाखोली बांधकामासाठी सध्या सहा लाख रूपयांची मर्यादा आहे. जीएसटी व डीएसआर वाढीमुळे इतक्या रकमेमध्ये इमारत होत नसल्याची समस्या सदस्यांनी मांडली. याबाबत कार्यकारी अभियंता यांनी यामध्ये तथ्य असल्याचे सांगितले. खोल्या बांधण्यासाठी आठ ते साडेआठ लाख रुपये मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत ग्रामपंचायतीकडील चौदाव्या वित्त आयोगातून वरील निधीसाठी ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या.जिल्ह्यात तब्बल ४०६ कोटींच्या राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झालेल्या आहेत. त्यांची अंदाजपत्रके तयार करण्यासाठी आपली यंत्रणा कमी पडू शकते, त्यामुळे सल्लागार अभियंता नेमण्यासाठी तात्काळ बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेऊन नियोजन करा, अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या.