शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

खानापूरबाबत न्यायालयात याचिका

By admin | Updated: August 30, 2016 23:55 IST

बाबासाहेब मुळीक : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यसंख्या निश्चितीत तालुक्यावर अन्याय

विटा : खानापूर पंचायत समिती क्षेत्रात राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेसाठी तीन व पंचायत समितीसाठी सहा सदस्यसंख्या निश्चित करून खानापूर तालुक्यावर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरूध्द लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती खानापूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. अ‍ॅड. मुळीक म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गटांची संख्या निश्चित करताना २०११ ची जनगणना विचारात घेतली आहे. जनगणनेनुसार खानापूर नगरपंचायत व विटा नगरपरिषद वगळता खानापूर पंचायत समिती क्षेत्राची लोकसंख्या १ लाख १५ हजार ४६८ इतकी आहे. पूर्वी २००१ ची लोकसंख्या १ लाख २१ हजार १३९ होती. आता खानापूर नगरपंचायतीमुळे खानापूर गावाची ६ हजार ४५७ लोकसंख्या वगळण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर पंचायत समिती क्षेत्रात गेल्या १० वर्षात केवळ ७८६ ने लोकसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे.राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद सदस्यसंख्या निश्चित करताना जिल्ह्यात व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे तिथेपर्यंत सर्व जि. प. गटात समान लोकसंख्या ठेवणे आवश्यक आहे. खानापूर तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट तयार केले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गटात सरासरी ३८ हजार ४८९ एवढी लोकसंख्या होते. परिणामी, खानापूर तालुक्यातील जि. प. गट जिल्ह्यातील सर्वात मोठे गट झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तीनही जि. प. गटात महिलांचे आरक्षण येण्याची शक्यता आहे. पंचायत समितीत सहा सदस्यसंख्या राहणार आहे. त्यात एक जागा सर्वसाधारण पुरूष, दोन जागा सर्वसाधारण महिला, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, एक जागा अनुसूचित जाती पुरूष असे आरक्षण राहणार आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात तीन महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समितीत एक सर्वसाधारण पुरूष अशी खानापूर तालुक्याची अवस्था राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पदाधिकारी तसेच जिल्हा नियोजन समितीत प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी अडचण आहे, असे ते म्हणाले.त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची सदस्यसंख्या निश्चितीचा निर्णय हा खानापूर तालुक्यावर मोठा अन्याय आहे. या निर्णयाविरूध्द मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. या याचिकेत पक्षीय राजकारण, गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अ‍ॅड मुळीक यांनी केले. (वार्ताहर) तालुक्याचा दबदबा कमी होणार...कडेगाव व खानापूर हे दोन्ही तालुके अखंड असताना आठ जि. प. सदस्य प्रतिनिधीत्व करीत होते. संपतराव माने, मोहनराव कदम, मालन मोहिते यांना जि. प. अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खानापूर तालुक्याचा दबदबा व मोठे वजन होते. परंतु, राज्य निवडणूक आयोगाच्या सदस्यसंख्या निश्चितीमुळे हा दबदबा कमी होणार असल्याचे मुळीक म्हणाले.