शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

खेळाडू तेच, कर्णधार नवा

By admin | Updated: August 11, 2015 23:38 IST

नवे मुख्याधिकारी : इस्लामपूरची बारामती होणार का?

अशोक पाटील - इस्लामपूर माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी इस्लामपूरची बारामती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारीपद सांभाळलेल्या दीपक झिंजाड यांना येथील मुख्याधिकारीपदी बसविले आहे. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केलेले पालिकेतील खेळाडू तेच आहेत, केवळ कर्णधार नवीन येत आहे. ते तरी इस्लामपूरची बारामती करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पालिकेने विविध विकास कामांवर कोट्यवधीचा खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे केल्याचा दावा केला आहे, परंतु ती निकृष्ट झाल्याने काही प्रकल्पांचे नूतनीकरण करण्याचा डाव आखला आहे. गेल्या साडेचार वर्षात तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी हायटेक सिटी करण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांना दाखविले होते. त्यामध्ये पालिकेतील काही नेते अडकले. मात्र देशमुख यांनी इस्लामपूर शहर केवळ कागदोपत्री हायटेक करून ठेवले. सवंग लोकप्रियतेसाठी सोशल मीडियावर घोषणांचा डंका वाजवला गेला. त्यामुळे आता जयंत पाटील यांनी झिंजाड यांना मुख्याधिकारीपदी काम करण्यासाठी पाचरण केले आहे. मुख्याधिकारी देशमुख यांची बदली करून त्यांच्या जागी झिंजाड यांना इस्लामपुरात आणले असल्याचा दावा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. सध्या इस्लामपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पोहण्याच्या तलावाचे तीनतेरा वाजले आहेत. हा तलाव दुरुस्तीच्या नावाखाली सध्या बंद आहे. अंबिका देवालयानजीकची पूर्वीची बाग उद्ध्वस्त करून त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाग उभारण्याचे काम सुरू आहे. कोट तलाव येथील बोटिंग क्लबचे काम अर्ध्यावरच सोडण्यात आले आहे. घनकचरा नियोजन, प्रभागातील गटारींची अवस्था दयनीय आहे. तुंबलेली गटारे काढण्यास स्वच्छता विभाग असमर्थ ठरला आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने पाऊस पडण्याअगोदरच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. १९८० पासून नवीन विकास आराखड्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे या नव्या कर्णधाराला जयंतरावांच्या जुन्याच खेळाडूंसमवेत काम करताना आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारीपद भूषविलेले दीपक झिंजाड मंगळवारी इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारपदी रूजू झाले आहेत.मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचे स्वागतच होईल. त्यांनी पारदर्शक कारभार करणे गरजेचे आहे. सध्या पालिका वर्तुळात एजंट, बोगस ठेकेदारांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व कारभार अनागोंदीसह भ्रष्टाचारी बनला आहे. शहरात होणारा विकास खुंटला असून, जो विकास झाला आहे, त्याचा दर्जा ढासळलेला आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते