शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समिती बिनविरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध करण्यावर मंगळवारी सर्वपक्षीय एकमत झाले. काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत एक अतिरिक्त जागा मागितली असून, जागावाटपाचा निर्णय मुंबईत उद्या, गुरुवारी होणाºया बैठकीत होणार आहे.नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध करण्यावर मंगळवारी सर्वपक्षीय एकमत झाले. काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत एक अतिरिक्त जागा मागितली असून, जागावाटपाचा निर्णय मुंबईत उद्या, गुरुवारी होणाºया बैठकीत होणार आहे.नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, बाळासाहेब पाटील, पक्षप्रतोद चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख,जितेंद्र पाटील यांची संयुक्त बैठक झाली.आपापल्या सदस्यसंख्येनुसार जागा मिळाव्यात, अशी मागणी बैठकीत सर्व पक्षांनी केली. मात्र जागांची अदलाबदल केली जाणार आहे. त्याबाबतही एकमत असल्याने नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जिल्हा परिषदेतील एक जागा वाढवून मागितली आहे. त्यामुळे आघाडीला दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपकडून त्याबदल्यात नगरपंचायत अथवा नगरपालिकेतील एक जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आहे. मात्र सभापतीसह विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. मागील दहा वर्षात समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही परंपरा कायम ठेवण्याबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली. जागावाटप निश्चितीसाठी मुंबईत गुरुवारी बैठक होणार आहे.जिल्हा परिषदेच्या ६0 सदस्यांमधून २३ सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून जातील. सत्ताधारी भाजप आघाडीचे संख्याबळ ३५ आहे. आघाडीतील १४ सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे विरोधी आघाडीचे संख्याबळ २५ आहे. या संख्याबळानुसार जिल्हा नियोजन समितीवर विरोधी आघाडीचे ९ सदस्य निवडून जातील. काँग्रेसचे संख्याबळ दहा असून त्यांचे ४ सदस्य निवडून जातील. राष्ट्रवादी व एक अपक्ष यांचे संख्याबळ पंधरा असल्याने त्यांच्यामधून ५ सदस्य निवडून जाणार आहेत.इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस, जत या सहा नगरपालिकांमधून तीनजण नियुक्त होणार आहेत. तीनही जागा आघाडीकडे जातील. कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा या चार नगरपंचायतींमधून एक नगरसेवक समितीवर निवडून जाणार आहे. राष्ट्रवादीने, आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले, तर काँगे्रसने, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम व डॉ. पतंगराव कदम यांच्याशी याबाबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले.