शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

नियोजन समिती बिनविरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध करण्यावर मंगळवारी सर्वपक्षीय एकमत झाले. काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत एक अतिरिक्त जागा मागितली असून, जागावाटपाचा निर्णय मुंबईत उद्या, गुरुवारी होणाºया बैठकीत होणार आहे.नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध करण्यावर मंगळवारी सर्वपक्षीय एकमत झाले. काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत एक अतिरिक्त जागा मागितली असून, जागावाटपाचा निर्णय मुंबईत उद्या, गुरुवारी होणाºया बैठकीत होणार आहे.नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, बाळासाहेब पाटील, पक्षप्रतोद चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख,जितेंद्र पाटील यांची संयुक्त बैठक झाली.आपापल्या सदस्यसंख्येनुसार जागा मिळाव्यात, अशी मागणी बैठकीत सर्व पक्षांनी केली. मात्र जागांची अदलाबदल केली जाणार आहे. त्याबाबतही एकमत असल्याने नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जिल्हा परिषदेतील एक जागा वाढवून मागितली आहे. त्यामुळे आघाडीला दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपकडून त्याबदल्यात नगरपंचायत अथवा नगरपालिकेतील एक जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आहे. मात्र सभापतीसह विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. मागील दहा वर्षात समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही परंपरा कायम ठेवण्याबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली. जागावाटप निश्चितीसाठी मुंबईत गुरुवारी बैठक होणार आहे.जिल्हा परिषदेच्या ६0 सदस्यांमधून २३ सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून जातील. सत्ताधारी भाजप आघाडीचे संख्याबळ ३५ आहे. आघाडीतील १४ सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे विरोधी आघाडीचे संख्याबळ २५ आहे. या संख्याबळानुसार जिल्हा नियोजन समितीवर विरोधी आघाडीचे ९ सदस्य निवडून जातील. काँग्रेसचे संख्याबळ दहा असून त्यांचे ४ सदस्य निवडून जातील. राष्ट्रवादी व एक अपक्ष यांचे संख्याबळ पंधरा असल्याने त्यांच्यामधून ५ सदस्य निवडून जाणार आहेत.इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस, जत या सहा नगरपालिकांमधून तीनजण नियुक्त होणार आहेत. तीनही जागा आघाडीकडे जातील. कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा या चार नगरपंचायतींमधून एक नगरसेवक समितीवर निवडून जाणार आहे. राष्ट्रवादीने, आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले, तर काँगे्रसने, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम व डॉ. पतंगराव कदम यांच्याशी याबाबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले.