शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारित भागातील सांडपाणी निचऱ्यासाठी योजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:30 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात उपनगरे, विस्तारित भागात पावसाचे साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाणी निचरा करणारी योजना महापालिकेने हाती घ्यावी. ...

सांगली : महापालिका क्षेत्रात उपनगरे, विस्तारित भागात पावसाचे साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाणी निचरा करणारी योजना महापालिकेने हाती घ्यावी. यासाठी तातडीने प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा व महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी हरित न्यायालयात आठ दिवसांत याचिका दाखल करणार असल्याचे नगरसवेक अभिजीत भोसले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

भोसले म्हणाले, महापालिका स्थापन होऊन २२ वर्षे झाली, मात्र अद्याप उपनगरे व विस्तारित भागातील सांडपाणी निचरा करणारी कोणतीही व्यवस्था महापालिकेने निर्माण केली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचून विस्तारित भागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. या भागातील जमिनीची पाणी शोषण करण्याची क्षमताही आता संपली आहे. त्यामुळे शोषखड्डे भरून वाहत आहेत, कूपनलिकांना दूषित पाणी लागत आहे. याकडे महापाालिकेने दुर्लक्ष केले आहे. हिवताप, मलेरिया यासह कीटकजन्य आजाराचे प्रमाण विस्तारित भागातील नागरिकांमध्ये जास्त आहे, असा अहवाल हिवताप कार्यालयाने दिला आहे. तरीही पालिकेला जाग येताना दिसत नाही. त्यामुळे आता या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. विस्तारित भागातील सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न केवळ नागरिकांच्या आरोग्याचा नाही तर पार्यावरणाचाही आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. त्यामुळे हरित न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भोसले म्हणाले, महापालिकेच्या २०१० मधील एका स्थायी समितीत तसेच २०१५ मधील महासभेत विस्तारित भागातील सांडपाणी निचरा करण्यासाठी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसा ठरावही झाला. मात्र यावर आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. वास्तविक या कामासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला पाहिजे. त्यानुसार योजना राबवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दरवर्षी त्यावर खर्च केला पाहिजे. येत्या चार-पाच वर्षांत ही योजना पूर्ण केली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी या मागणीसाठी महापालिका, आरोग्य विभाग, नगरविकास विभाग यांच्याविरोधात हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. ॲड. असिम सरोदे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

चौकट

हिवताप विभागाचा अहवाल, रुग्णसंख्या जादा

अभिजित भोसले म्हणाले, विस्तारित भागातील पावसाळी पाणी, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील जमिनीची पाणी शोषण करण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी निचरा न होता ठिकठिकाणी साचून राहते. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. विस्तारित भागात हिवताप व अन्य कीटकजन्य आजारांचे रुग्ण जास्त असल्याचा अहवाल या विभागाने दिला आहे.