शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विस्तारित भागातील सांडपाणी निचऱ्यासाठी योजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:30 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात उपनगरे, विस्तारित भागात पावसाचे साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाणी निचरा करणारी योजना महापालिकेने हाती घ्यावी. ...

सांगली : महापालिका क्षेत्रात उपनगरे, विस्तारित भागात पावसाचे साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाणी निचरा करणारी योजना महापालिकेने हाती घ्यावी. यासाठी तातडीने प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा व महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी हरित न्यायालयात आठ दिवसांत याचिका दाखल करणार असल्याचे नगरसवेक अभिजीत भोसले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

भोसले म्हणाले, महापालिका स्थापन होऊन २२ वर्षे झाली, मात्र अद्याप उपनगरे व विस्तारित भागातील सांडपाणी निचरा करणारी कोणतीही व्यवस्था महापालिकेने निर्माण केली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचून विस्तारित भागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. या भागातील जमिनीची पाणी शोषण करण्याची क्षमताही आता संपली आहे. त्यामुळे शोषखड्डे भरून वाहत आहेत, कूपनलिकांना दूषित पाणी लागत आहे. याकडे महापाालिकेने दुर्लक्ष केले आहे. हिवताप, मलेरिया यासह कीटकजन्य आजाराचे प्रमाण विस्तारित भागातील नागरिकांमध्ये जास्त आहे, असा अहवाल हिवताप कार्यालयाने दिला आहे. तरीही पालिकेला जाग येताना दिसत नाही. त्यामुळे आता या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. विस्तारित भागातील सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न केवळ नागरिकांच्या आरोग्याचा नाही तर पार्यावरणाचाही आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. त्यामुळे हरित न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भोसले म्हणाले, महापालिकेच्या २०१० मधील एका स्थायी समितीत तसेच २०१५ मधील महासभेत विस्तारित भागातील सांडपाणी निचरा करण्यासाठी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसा ठरावही झाला. मात्र यावर आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. वास्तविक या कामासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला पाहिजे. त्यानुसार योजना राबवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दरवर्षी त्यावर खर्च केला पाहिजे. येत्या चार-पाच वर्षांत ही योजना पूर्ण केली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी या मागणीसाठी महापालिका, आरोग्य विभाग, नगरविकास विभाग यांच्याविरोधात हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. ॲड. असिम सरोदे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

चौकट

हिवताप विभागाचा अहवाल, रुग्णसंख्या जादा

अभिजित भोसले म्हणाले, विस्तारित भागातील पावसाळी पाणी, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील जमिनीची पाणी शोषण करण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी निचरा न होता ठिकठिकाणी साचून राहते. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. विस्तारित भागात हिवताप व अन्य कीटकजन्य आजारांचे रुग्ण जास्त असल्याचा अहवाल या विभागाने दिला आहे.