शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘स्वाभिमानी’कडून मंगळवारी याचिका

By admin | Updated: September 5, 2016 00:10 IST

महापालिका : स्थायी सदस्य निवडीचा वाद; कागदपत्रांची जुळवाजुळव

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीचा वाद आता न्यायालयात जाणार आहे. येत्या मंगळवारी स्वाभिमानी आघाडीकडून या निवडीला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीसाठी १ सप्टेंबर रोजी महासभा झाली. काँग्रेस तीन, राष्ट्रवादी तीन व स्वाभिमानी आघाडीचे दोन सदस्य निवडले जाणार होते; पण स्वाभिमानी आघाडीतील एका गटाचे नगरसेवक युवराज बावडेकर, स्वरदा केळकर यांनी आघाडीची मान्यता रद्द झाल्याने दोन सदस्यांची निवड करू नये, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्वाभिमानीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीनंतर स्वाभिमानीच्या दोन जागा घ्याव्यात, असे मत मांडले. त्यावर तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत महापौर हारुण शिकलगार यांनी स्वाभिमानी आघाडीच्या दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या. त्यातून महापौर विरुद्ध उपमहापौर गटात संघर्ष पेटला आहे. महापौरांच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानीने मुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. त्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या मंगळवारी ही याचिका दाखल होणार आहे. विभागीय आयुक्तांकडे स्वाभिमानी आघाडीची स्वतंत्र नोंदणी आहे. ही नोंदणी पाच वर्षासाठी असते. त्यामुळे स्थायी समितीतील स्वाभिमानीचा हिस्सा कायम असून, दोन जागांची नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थायी सदस्य निवडी कायद्याच्या कचारट्यात अडकण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) वाद नगरसेवकांचा : प्रशासन शांतच... स्थायी समिती सदस्य निवडीवरून काँग्रेसमध्येच वाद उफाळला आहे. या वादात प्रशासनाने मात्र शांतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या वादात प्रशासनाची कोंडी होऊ नये, यासाठी सावध पावले टाकली जात आहेत. विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाकडे स्वाभिमानीने तक्रारी केल्या आहेत. पण त्याबाबत अजूनही तरी प्रशासनाला कोणतेही विचारणा झालेली नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्यास प्रशासनाचा अहवाल पाठविण्याची तयारी केली आहे. तसा गोपनीय अहवालही प्रशासनाने तयार करून ठेवला आहे. पण जोपर्यंत कोणत्याही कार्यालयाकडून अहवाल मागविला जात नाही, तोपर्यंत तो न पाठविण्याच्या मन:स्थितीत आहे.