शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘स्वाभिमानी’कडून मंगळवारी याचिका

By admin | Updated: September 5, 2016 00:10 IST

महापालिका : स्थायी सदस्य निवडीचा वाद; कागदपत्रांची जुळवाजुळव

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीचा वाद आता न्यायालयात जाणार आहे. येत्या मंगळवारी स्वाभिमानी आघाडीकडून या निवडीला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीसाठी १ सप्टेंबर रोजी महासभा झाली. काँग्रेस तीन, राष्ट्रवादी तीन व स्वाभिमानी आघाडीचे दोन सदस्य निवडले जाणार होते; पण स्वाभिमानी आघाडीतील एका गटाचे नगरसेवक युवराज बावडेकर, स्वरदा केळकर यांनी आघाडीची मान्यता रद्द झाल्याने दोन सदस्यांची निवड करू नये, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्वाभिमानीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीनंतर स्वाभिमानीच्या दोन जागा घ्याव्यात, असे मत मांडले. त्यावर तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत महापौर हारुण शिकलगार यांनी स्वाभिमानी आघाडीच्या दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या. त्यातून महापौर विरुद्ध उपमहापौर गटात संघर्ष पेटला आहे. महापौरांच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानीने मुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. त्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या मंगळवारी ही याचिका दाखल होणार आहे. विभागीय आयुक्तांकडे स्वाभिमानी आघाडीची स्वतंत्र नोंदणी आहे. ही नोंदणी पाच वर्षासाठी असते. त्यामुळे स्थायी समितीतील स्वाभिमानीचा हिस्सा कायम असून, दोन जागांची नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थायी सदस्य निवडी कायद्याच्या कचारट्यात अडकण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) वाद नगरसेवकांचा : प्रशासन शांतच... स्थायी समिती सदस्य निवडीवरून काँग्रेसमध्येच वाद उफाळला आहे. या वादात प्रशासनाने मात्र शांतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या वादात प्रशासनाची कोंडी होऊ नये, यासाठी सावध पावले टाकली जात आहेत. विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाकडे स्वाभिमानीने तक्रारी केल्या आहेत. पण त्याबाबत अजूनही तरी प्रशासनाला कोणतेही विचारणा झालेली नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्यास प्रशासनाचा अहवाल पाठविण्याची तयारी केली आहे. तसा गोपनीय अहवालही प्रशासनाने तयार करून ठेवला आहे. पण जोपर्यंत कोणत्याही कार्यालयाकडून अहवाल मागविला जात नाही, तोपर्यंत तो न पाठविण्याच्या मन:स्थितीत आहे.