शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या एलईडी प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST

सांगली : महापालिकेच्या साठ कोटींच्या एलईडी प्रकल्पात अपात्र ठरविलेल्या इ स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स या कंपनीने महापालिका व समुद्रा इलेक्ट्रानिक्स ...

सांगली : महापालिकेच्या साठ कोटींच्या एलईडी प्रकल्पात अपात्र ठरविलेल्या इ स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स या कंपनीने महापालिका व समुद्रा इलेक्ट्रानिक्स या दोघांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रकल्पासाठी समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने नियमबाह्यरित्या पात्र ठरविण्यात आल्याचा आक्षेप ई स्मार्ट कंपनीने घेतला. ॲड. अश्विन साकोळकर आणि ॲड. अमित याडकीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर आठ किंवा नऊ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

महापालिका क्षेत्रात सुमारे ३३ हजार पथदिवे आहेत. या पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी ६० कोटी रु पयांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली होती. तीनदा मुदतवाढ देऊन प्रकल्पासाठी समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स आणि ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स या दोन कंपन्यांच्या निविदा आल्या. त्यापैकी समुद्रा कंपनीला पात्र ठरविण्यात आले. तर अपूर्ण कागदपत्रांचा ठपका ठेवत ई स्मार्टला अपात्र ठरविले गेले.

या विरोधात आता ई स्मार्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निविदेच्या अटी शर्तीमध्ये कंपनीची सलग तीन वर्षे १५ कोटीची उलाढाल बंधनकारक होती. पण समुद्रा कंपनीची २०१७-१८ ची उलाढाल ६ कोटीवर आहे. त्यामुळे या कंपनीकडून अटी व शर्तीचा भंग झाला असतानाही तिला पात्र ठरविण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ई स्मार्टने विहित मुदतीत अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही त्याचा विचार महापालिकेने केलेला नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

चौकट

याचिकेतील मुद्दे

महापालिकेने कोणतेही सबळ कारण नसताना ई स्मार्ट सोल्युशन कंपनीची निविदा फेटाळली तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या समुद्रा कंपनीला मात्र पात्र ठरविले आहे. त्याचा विचार न्यायालयाने करावा, अशी विनंती याचिकेत केली आहे. तसेच समुद्रा कंपनीला प्रकल्प मिळावा या हेतूने निविदा प्रक्रियेतही ढवळाढवळ केल्याचा दावाही ई स्मार्टने केला आहे.

चौकट

स्थायी समितीसमोर अडचण

एलईडी प्रकल्पासाठी समुद्रा कंपनीच्या निविदेला मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. पण गेल्या दोन आठवड्यापासून स्थायीची सभा झाली नाही. त्यामुळे निविदेला मंजुरी मिळालेली नाही. त्यात आता ही बाब न्यायप्रविष्ठ झाल्याने स्थायी समितीला निर्णय घेण्यात अडचण येणार आहे.