शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

ड्रेनेज योजनेच्या विरोधात न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:30 IST

सांगली : सांगली व मिरज शहरासाठी शासनाच्या ड्रेनेज योजनेचे गेल्या आठ वर्षांत केवळ ६५ टक्के काम पूर्ण आहे. ...

सांगली : सांगली व मिरज शहरासाठी शासनाच्या ड्रेनेज योजनेचे गेल्या आठ वर्षांत केवळ ६५ टक्के काम पूर्ण आहे. अजूनही योजनेतील महत्त्वाची कामे झालेली नाहीत. दुसरीकडे ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली आहेत. त्यामुळे या योजनेच्या कामाचे शासनाने आर्थिक लेखापरीक्षण करावे, दोषींवर कारवाई करावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

भोसले म्हणाले, सांगली, मिरजेसाठी शासनाने ड्रेनेज योजनेला २०१० मध्ये मंजुरी दिली. २०१२ मध्ये या कामाची निविदा प्रसिध्द झाली. सांगली व मिरजेसाठी ११४ कोटी योजनेजी मूळ किंमत होती. मंजूर निविदाधारकास तब्बल ५० टक्के जादा दरवाढ देण्यात आली. त्यामुळे योजनेची किंमत वाढली. या कामाची वर्कऑर्डर २०१३ मध्ये ठाणे येथील एमएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला देण्यात आली. दोन वर्षे कामाची मुदत होती. मात्र गेल्या आठ वर्षांत केवळ ६५ टक्के काम झाले आहे. ट्रक लाईन जोडणे, मुख्य पाईपलाईन, सांगली, मिरजेतील पंपहाऊस, एसटीपीची कामे बाकी आहेत. ही महत्त्वाची कामे मागे ठेवून केवळ रस्त्यांवर व सोपी पाईपलाईन टाकण्याची कामे ठेकेदाराने केली आहेत. ठेकेदारास तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. नोव्हेंबर २०१९ मध्ये अंतिम मुदतवाढ संपली आहे. यानंतर या योजनेच्या कामाला स्थायी समिती किंवा महासभेने मुदतवाढ दिलेली नाही.

भोसले म्हणाले, आतापर्यंत योजनेवर ८६ कोटी रुपये खर्च झाला आहे, तर महापालिकेच्या लेखा विभागाकडून १६५ कोटी रुपये, तर ड्रेनेज विभाग १४१ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगत आहे. या तीन विभागांत मोठी तफावत आहे. त्यातच योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने महापालिकेचे ड्रेनेज करातून मिळणारे सुमारे ९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाची सखोल चौकशी करावी, योजनेवरील खर्चाचे आर्थिक लेखा परीक्षण करावे व यातील दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात येत्या आठ दिवसांत याचिका दाखल करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. या याचिकेत महापालिकेसह, जीवन प्राधिकरण, शासनाचा नगरसचिव व आरोग्य विभाग व ठेकेदारास वादी करणार असल्याचेही ते म्हणाले.

चौकट

ठेकेदाराकडून दंडाची वसुली नाही

अभिजित भोसले म्हणाले, ड्रेनेज योजनेचे ठेकेदार कामास विलंब लावत असल्याने ठेकेदारास रोज ४० हजार रुपये दंड करण्यात आला आहे. याबाबत नोव्हेंबर २०१७ मध्ये महासभेत ठराव झाला आहे. तत्कालीन पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या बिलातून १ कोटी ३६ लाख रुपये त्यावेळी दंडापोटी वसूल केले. मात्र त्यानंतर आजतागायत एक रुपयाचाही दंड वसूल केलेला नाही.