शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाला बळ देणाऱ्यालाच लोकसभेची उमेदवारी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:27 IST

सांगली : काँग्रेस पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बळ देणाºया, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी ...

सांगली : काँग्रेस पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बळ देणाºया, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी भूमिका युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली. लोकसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणू. त्यासाठी ८ जानेवारीनंतर जिल्हाभरात फिरून पक्षबांधणी मजबूत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. कदम म्हणाले की, राज्यासह देशभरात भाजप सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यापारीवर्ग सरकारच्या धोरणांवर नाराज आहे. या सरकारच्या कारकीर्दीत कोणताच घटक समाधानी नाही. केवळ घोषणा करणाºया भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य भरडून निघत आहे. हा असंतोष नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांत उफाळून आला. त्यामुळे तेथे भाजपची पीछेहाट झाली, तर काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यारूपाने आश्वासक चेहरा समोर आल्याने काँग्रेसला भरभरून यश मिळाले. देशभरात भाजपविरोधी वातावरण तयार झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निश्चित चांगले यश मिळणार आहे.ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवर काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देणाºया, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाºया निष्ठावंतालाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी भूमिका आपण प्रदेश काँग्रेसच्या बैठकीतही मांडली आहे.पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलने, मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. पक्ष मजबूत करत आहेत. त्याच पद्धतीने आम्हीही आंदोलनांमध्ये सहभागी होत आलो आहोत. घरात बसून उमेदवारी मागण्याचे आणि निवडून येण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. रस्त्यावर उतरून सामान्यांसाठी झगडणाºया आणि सामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ देणाºयालाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली पाहिजे. मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अर्थात पक्षाने दिलेल्या कोणत्याही उमेदवारासाठी जिवाचे रान करू आणि त्याला निवडून आणू.येत्या ८ जानेवारीनंतर जिल्हाभरात फिरणारआ. विश्वजित कदम म्हणाले की, ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या आकस्मिक मृत्यूने काँग्रेस पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आपण स्वत: ८ जानेवारीनंतर जिल्हाभरात फिरून पक्षबांधणी मजबूत करण्यावर भर देणार आहोत. प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज होतील, अशादृष्टीने प्रयत्न करणार आहोत.पलूस-कडेगावसाठी जादा वेळडॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, लोकांना विकास कामांबाबत विश्वास देण्यासाठी मी तेथे जादा वेळ दिला. महिन्यातून पंधरा दिवस मतदारसंघात तळ ठोकून विकासकामे मार्गी लावली. विधानसभेच्या संपूर्ण मतदारसंघात फिरलो. गावा-गावांतील कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकलो. आता तसा वेळ संपूर्ण जिल्ह्यासाठी देऊन, दौरे करून कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे.