शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जिल्ह्यात सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

सांगली : गेल्या आठवड्यापासून घटत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल केले. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांखाली आल्याने ...

सांगली : गेल्या आठवड्यापासून घटत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल केले. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांखाली आल्याने तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू करण्यात आले असून, सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले. जिल्ह्याच्या काही भागात निर्माण झालेली महापूरस्थितीवगळता इतर भागातील व्यापाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या हजारावर असल्याने पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांवर कायम होता. या आठवड्यात मात्र दिलासा मिळताना, रुग्णसंख्या आठशेवर आली आहे. यामुळे पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने तिसऱ्या स्तरात जिल्ह्याचा समावेश केला आहे. रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले.

प्रशासनाच्या नवीन आदेशानुसार दुपारी चारपर्यंत आता सर्व व्यवसाय, सेवा सुरू राहणार आहेत.

नवीन आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहेत. त्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शासकीय व खासगी कार्यालयातील कामकाज ५० टक्के क्षमतेसह सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शहरासह जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांना पुराचा फटका बसल्याने त्याठिकाणी व्यवहार सुरू होण्यास अडचणी असल्या तरी तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू केल्याने जिल्ह्यातील इतर ठिकाणी मात्र, सर्व व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत. त्यामुळे महिनाभरापासून दुकाने उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चौकट

वीकेंड लॉकडाऊन असणार

प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असली तरी शनिवार व रविवारी दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही दिवस संपूर्ण जिल्हाभर ‘वीकेंड लॉकडाऊन’ असणार आहे.