शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जिल्ह्यात वाढता वाढतोय मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी वाढत असलेली जागृती व प्रशासनानेही सुरू केलेल्या प्रबोधन मोहिमेचा सकारात्मक परिणाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी वाढत असलेली जागृती व प्रशासनानेही सुरू केलेल्या प्रबोधन मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या चार निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान होतच असते मात्र, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही टक्केवारीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे.

निवडणुकीसाठी मतदान म्हणजे अनेकांना सुटीचा दिवस वाटतो त्यामुळे अनेकदा अपेक्षित मतदान होताना दिसत नाही. मात्र, जिल्ह्यात तरूण मतदारांची संख्या वाढत असल्यानेही मतदानाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी प्रशासनानेही चांगले नियोजन केले आहे. केवळ निवडणुकीपुरतेच प्रबोधन न करता तरूण मतदारांना थेट कॉलेजवर जाऊन तर सोशल मीडियावरूनही मतदानाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे नवमतदार नोंदणीसह प्रत्यक्ष मतदानातही टक्केवारी वाढत आहे.

चौकट

लोकसभा निवडणुकीत टक्का वाढला

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६३.४७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या पंचवार्षिकमध्ये तरूण मतदारांची संख्या वाढल्याने मतदानासाठी सुलभ केंद्राची व्यवस्था झाल्याने २०१९ मध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले. २०१९ ला लोकसभा निवडणुकीत मोठी टशन दिसून आली आणि मतदानाचा टक्का वाढत ६५.३८ टक्के मतदान झाले होते.

चौकट

विधानसभेतही चुरस

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ व २०१९ या दोन्ही वर्षी विधानसभेला चुरशीने मतदान झाले. २०१४ साली सरासरी ६५ ते ६६ टक्के असलेल्या मतदानात वाढ होत २०१९ ला ६८ टक्के मतदानाची सरासरी नोंदणी झाली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही टक्का वाढला होता.

चौकट

ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील अनेक गावात तब्बल ८५ ते ८७ टक्के मतदानाची नोंदणी झाली. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी ७६ ते ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने गेल्या चार निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सर्वाधिक मतदानाची नोंदणी झाली.