शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

टोळ्यांचे नव्हे, लोकांचे ऐकणार

By admin | Updated: July 19, 2014 23:22 IST

पतंगराव कदम : कॉँग्रेसच्या बैठकीत स्पष्टीकरण

सांगली : कॉँग्रेस पक्षात सर्वच ठिकाणी काही टोळ््या कार्यरत आहेत. या टोळ््यांकडून कुरघोड्या चालू असतात. आता कॉँग्रेस पक्ष उमेदवारी ठरविताना या टोळ््यांचे ऐकणार नाही. लोकांची मते आजमावूनच उमेदवार निश्चित केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पक्षाच्या पूर्वनियोजन बैठकीत दिली. मार्केट यार्डातील सभागृहात विधानसभा निवडणुकीची पूर्वनियोजन बैठक आज पार पडली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक रमाकांत खलप यावेळी उपस्थित होते. पतंगराव कदम म्हणाले की, गोव्यात खलप यांच्यावर पक्षांतर्गत टोळीकडून बराच अन्याय झाला. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. अशा टोळ््यांचा उपद्रव सगळीकडेच आहे; मात्र पक्षाने आता या टोळ््यांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे. लोकांशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवार ठरविण्याची भानगडही आता राहणार नाही. प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांना चाचपणी करावी लागेल. सांगली जिल्ह्यात सध्या मी व सदाशिवराव पाटील दोघेच काँग्रेसचे आमदार आहोत. अन्य तालुक्यांमध्ये सक्षम व लोकांच्या पसंतीच्या उमेदवाराची पाहणी सुरू आहे. मिरज तालुक्यात थोडी अडचण आहे. तरीही आम्ही गावोगाव फिरणार आहोत. कार्यकर्त्यांनीही घरोघरी फिरण्यास सुरुवात करावी. लोकसभेवेळी नवरा आमच्यासोबत आणि बायका-मुले भाजपकडे होती, आता तसे चालणार नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून कॉँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करावी. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रचाराची एक फेरी पूर्ण करावी. तालुका कॉँग्रेस कमिट्या आता सक्रिय व्हायला हव्यात. रमाकांत खलप म्हणाले की, लोकसभेत गटबाजीमुळे आपली वाताहत झाली. विधानसभेला ती होऊ द्यायची नाही. पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकसंध काम करायला हवे. उमेदवार निश्चित करतानाही प्रत्येक मतदारसंघातून एकच नाव सर्वानुमते निश्चित झाले, तर चांगली ताकद त्यामागे लावता येईल. शहराध्यक्ष मुन्ना कुरणे म्हणाले की, पंख्याखाली बसून उमेदवार निश्चित केले जाऊ नयेत. अन्यथा लोकसभेसारखी परिस्थिती उद्भवू शकते. (प्रतिनिधी)गणित बिघडले, तर सत्यजितला संधीआघाडीचे गणित बिघडले, तर सत्यजित देशमुख यांना संधी मिळेल आणि आघाडीचे जमले तर मग त्यांचे अवघड आहे, अशा शब्दात पतंगरावांनी शिराळ््यातील उमेदवारीबाबत मत स्पष्ट केले.कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, कॉँग्रेसला कधीही राष्ट्रवादीची साथ मिळाली नाही. आघाडी ही कॉँग्रेसच्या फायद्याची नाही. आघाडी करू नये म्हणून निरीक्षकांनी पक्षश्रेष्ठींना सांगावे. दिगंबर जाधव यांच्या नागरी प्रश्नांच्या रथाचा उल्लेख करताना पतंगराव म्हणाले की, दिगंबरने एक रथ केला आहे म्हणे. मी तो पाहिलाच नाही. पतंगरावांनी केलेला हा इशारा होता की टोमणा, असा प्रश्न मदन पाटील समर्थकांना पडला होता. कॉँग्रेसमध्ये अचानक उमेदवारी देण्याच्या प्रकाराबाबत पतंगरावांनी धत्तुरेंचे उदाहरण दिले. निरीक्षकांकडे पहात ते म्हणाले की, समोर बसलेले दाढीवाले आहेत ना, तेच धत्तुरे. त्यांना पक्षाने अचानक उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. ऐनवेळी तिकीट मिळाले तरीही आम्ही जोमाने प्रचार केला. दोनवेळा त्यांनी आमदारकी भूषविली.