शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

चांदोली अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांसोबत जगणारी माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:27 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात सध्या स्थानिक नागरिक आणि वन्यप्राणी यांच्यात सहजीवन ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात सध्या स्थानिक नागरिक आणि वन्यप्राणी यांच्यात सहजीवन बघावयास मिळत आहे. परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राणी यांच्यावर शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे.

जंगलात नैसर्गिक गवत खाद्याची कमतरता भासते. या दिवसात मार्च ते जूनपर्यंत जंगलातील गवे आणि इतर शाकाहारी प्राणी पोट भरण्यासाठी गावाच्या हद्दीत येत आहेत. चांदोली अभयारण्य परिसरात असणाऱ्या विविध गावांच्या आसपास मका, ऊस शेती, इतर भाज्या यांचे प्रमाण जास्त आहे. या हिरव्यागार चाऱ्याला आकर्षित होऊन रानगव्यासारखे प्राणी जनगलातून बाहेर येतात. येथील लोकांचे नुकसान होण, ही नित्याचीच बाब आहे.

परंतु गवे येत असल्यामुळे शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे. अभयारण्य परिसरातील शित्तूर, मनदूर, ऊखळ, काळोखेवाडी, सोनवडे, चरण, आरळा या भागातील सर्व शेतकरी आपल्या पिकांची रात्रीच्या वेळी आळीपाळीने राखण करत आहे. या परिसरात निरीक्षण केले असता, बऱ्याच शेतांमध्ये लोकांनी मचान उभारलेले दिसून येते.

लोक या मचाणावर रात्री बसून सकाळपर्यंत आपल्या पिकाची राखण करतात. या परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्या, रानडुकरांचा त्रास कमी झाला आहे, असेही येथील स्थानिक सांगतात. परंतु त्या तुलनेत गवे आणि वानर यांचा पिकांना त्रास जास्त आहे.

बिबट्यामुळे गावांमध्ये कुत्री कमी झाली आहेत. शेळ्या मेंढ्या यांच्यावर सुद्धा हल्ले झाले आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांनी केले आहे.

लोकांनी रात्री सर्पदंश होऊ नये म्हणून पायात बूट घालावे, सोबत बॅटरी ठेवणे आणि एका वेळी दोन ते तीन जणांचा ग्रुप करून गस्त करावी. लोकांनी वन्य प्राण्यांना इजा होईल असे कोणतेही वर्तन करू नये. गैरवर्तन अथवा गैरकृत्य केल्यामुळे गव्यांचा हल्ला होऊ शकतो. वन्यप्राणी त्रास दिल्यामुळे अधिक आक्रमक होतात. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखादी जखमी जनावर दिसून आल्यास वनविभागाला १९२६ या क्रमांकावर कळवून सहकार्य करावे.