शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांसोबत जगणारी माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:27 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात सध्या स्थानिक नागरिक आणि वन्यप्राणी यांच्यात सहजीवन ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात सध्या स्थानिक नागरिक आणि वन्यप्राणी यांच्यात सहजीवन बघावयास मिळत आहे. परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राणी यांच्यावर शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे.

जंगलात नैसर्गिक गवत खाद्याची कमतरता भासते. या दिवसात मार्च ते जूनपर्यंत जंगलातील गवे आणि इतर शाकाहारी प्राणी पोट भरण्यासाठी गावाच्या हद्दीत येत आहेत. चांदोली अभयारण्य परिसरात असणाऱ्या विविध गावांच्या आसपास मका, ऊस शेती, इतर भाज्या यांचे प्रमाण जास्त आहे. या हिरव्यागार चाऱ्याला आकर्षित होऊन रानगव्यासारखे प्राणी जनगलातून बाहेर येतात. येथील लोकांचे नुकसान होण, ही नित्याचीच बाब आहे.

परंतु गवे येत असल्यामुळे शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे. अभयारण्य परिसरातील शित्तूर, मनदूर, ऊखळ, काळोखेवाडी, सोनवडे, चरण, आरळा या भागातील सर्व शेतकरी आपल्या पिकांची रात्रीच्या वेळी आळीपाळीने राखण करत आहे. या परिसरात निरीक्षण केले असता, बऱ्याच शेतांमध्ये लोकांनी मचान उभारलेले दिसून येते.

लोक या मचाणावर रात्री बसून सकाळपर्यंत आपल्या पिकाची राखण करतात. या परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्या, रानडुकरांचा त्रास कमी झाला आहे, असेही येथील स्थानिक सांगतात. परंतु त्या तुलनेत गवे आणि वानर यांचा पिकांना त्रास जास्त आहे.

बिबट्यामुळे गावांमध्ये कुत्री कमी झाली आहेत. शेळ्या मेंढ्या यांच्यावर सुद्धा हल्ले झाले आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांनी केले आहे.

लोकांनी रात्री सर्पदंश होऊ नये म्हणून पायात बूट घालावे, सोबत बॅटरी ठेवणे आणि एका वेळी दोन ते तीन जणांचा ग्रुप करून गस्त करावी. लोकांनी वन्य प्राण्यांना इजा होईल असे कोणतेही वर्तन करू नये. गैरवर्तन अथवा गैरकृत्य केल्यामुळे गव्यांचा हल्ला होऊ शकतो. वन्यप्राणी त्रास दिल्यामुळे अधिक आक्रमक होतात. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखादी जखमी जनावर दिसून आल्यास वनविभागाला १९२६ या क्रमांकावर कळवून सहकार्य करावे.