शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

चांदोली अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांसोबत जगणारी माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:27 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात सध्या स्थानिक नागरिक आणि वन्यप्राणी यांच्यात सहजीवन ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात सध्या स्थानिक नागरिक आणि वन्यप्राणी यांच्यात सहजीवन बघावयास मिळत आहे. परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राणी यांच्यावर शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे.

जंगलात नैसर्गिक गवत खाद्याची कमतरता भासते. या दिवसात मार्च ते जूनपर्यंत जंगलातील गवे आणि इतर शाकाहारी प्राणी पोट भरण्यासाठी गावाच्या हद्दीत येत आहेत. चांदोली अभयारण्य परिसरात असणाऱ्या विविध गावांच्या आसपास मका, ऊस शेती, इतर भाज्या यांचे प्रमाण जास्त आहे. या हिरव्यागार चाऱ्याला आकर्षित होऊन रानगव्यासारखे प्राणी जनगलातून बाहेर येतात. येथील लोकांचे नुकसान होण, ही नित्याचीच बाब आहे.

परंतु गवे येत असल्यामुळे शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे. अभयारण्य परिसरातील शित्तूर, मनदूर, ऊखळ, काळोखेवाडी, सोनवडे, चरण, आरळा या भागातील सर्व शेतकरी आपल्या पिकांची रात्रीच्या वेळी आळीपाळीने राखण करत आहे. या परिसरात निरीक्षण केले असता, बऱ्याच शेतांमध्ये लोकांनी मचान उभारलेले दिसून येते.

लोक या मचाणावर रात्री बसून सकाळपर्यंत आपल्या पिकाची राखण करतात. या परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्या, रानडुकरांचा त्रास कमी झाला आहे, असेही येथील स्थानिक सांगतात. परंतु त्या तुलनेत गवे आणि वानर यांचा पिकांना त्रास जास्त आहे.

बिबट्यामुळे गावांमध्ये कुत्री कमी झाली आहेत. शेळ्या मेंढ्या यांच्यावर सुद्धा हल्ले झाले आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांनी केले आहे.

लोकांनी रात्री सर्पदंश होऊ नये म्हणून पायात बूट घालावे, सोबत बॅटरी ठेवणे आणि एका वेळी दोन ते तीन जणांचा ग्रुप करून गस्त करावी. लोकांनी वन्य प्राण्यांना इजा होईल असे कोणतेही वर्तन करू नये. गैरवर्तन अथवा गैरकृत्य केल्यामुळे गव्यांचा हल्ला होऊ शकतो. वन्यप्राणी त्रास दिल्यामुळे अधिक आक्रमक होतात. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखादी जखमी जनावर दिसून आल्यास वनविभागाला १९२६ या क्रमांकावर कळवून सहकार्य करावे.