शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पावसकरचा खून ‘सुपारी’ देऊन

By admin | Updated: April 1, 2015 00:06 IST

चौकशीत निष्पन्न : तपास ‘डीवायएसपीं’कडे सोपविला

सांगली : अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बसलेल्या शशिकांत पावसकर या तरुणाचा खून ‘सुपारी’ देऊन केला आहे, अशी धक्कादायक माहिती शहर पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. सहा महिने होऊन गेले तरी यातील मारेकऱ्यांना पकडण्यात तसेच त्यांची नावे निष्पन्न करण्यात यश न आल्याने खुद्द कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी हा तपास पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे सोपविला आहे.माधवनगर रस्त्यावरील पंचशीलनगर येथे राहणारा शशिकांत पावसकर एका रात्रीत घरातून अचानक गायब झाला होता. कृष्णा नदीत त्याचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याच्या तोंडातून व नाकातून रक्तस्त्राव झाला होता. खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले होते. शहर पोलिसांचा तपास सुरु झाला. एक-दोन महिने गेले, तरी कोणतेही धागेदोरे लागले नाहीत. मात्र हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गुंडाविरोधी पथकानेही याच्या तपासात उडी घेतली होती. पण कुणालाही याचा छडा लावला आला नाही. तब्बल सहा महिने होऊन गेले तरी पोलीस आजही तपास सुरू असल्याचेच सांगत आहेत. आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली असली तरी, यातून एक धागा हाती लागला नाही.काल, सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना पावसकर खुनाचा गुन्हा प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर हा तपास शहर पोलिसांकडून काढून घेऊन तो पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांना करण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)...पण पुरावे नाहीतखुनाचे कारण स्पष्ट झाले आहे. खुनासाठी ‘सुपारी’ दिल्याची धक्कादायक माहितीही तपासातून पुढे आली आहे. आज-ना-उद्या याचा निश्चितपणे छडा लागेल, असे पोलीस अधिकारी छातीठोकपणे सांगत आहेत. मारेकऱ्यांची नावेही समजली असली तरी, त्यांच्याबद्दल कोणताही पुरावा मिळालेला नाही.