शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

पवारांची भाकरी करपणारच !

By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST

उध्दव ठाकरे यांचा टोला : तीन मंत्री असूनही सांगलीच्या विकासाचा खेळखंडोबा

इस्लामपूर : शरद पवारांची भाकरी करपलेली आहे. तीच भाकरीच ते फिरवत आहेत. त्यामुळे इथून पुढेही त्यांचे उमेदवार करपणारच आहेत, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी इस्लामपूर येथील मेळाव्यात लगावला. इस्लामपूर येथील सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्'ांतील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते आ. सुभाष देसाई, रामदास कदम, संपर्क नेते दिवाकर रावते उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे विदर्भ, मराठवाड्यात आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्'ात तीन मंत्री असूनही विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. जत तालुक्यातील गावे पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची तयारी ठेवतात, तर कानडी अत्याचाराला कंटाळलेला सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडतोय. या सर्व जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष आहे.प्रत्येक घरात पोलीस दिला तरी अत्याचार रोखता येणार नाहीत, असे गृहमंत्रीच म्हणू लागले, तर या राज्यातील महिला, मुली सुरक्षित कशा राहतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वर्ष झाले तरी सापडत नाहीत. पोलीस मात्र हत्येचे धागेदोरे हाती लागल्याचे सांगतात, तपासासाठी दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधतात. मग या सरकारने जादूटोणाविरोधी कायदा कशासाठी केला?या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला औषधालासुध्दा ठेवायचे नाही. सांगलीतील पाच जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढविणार असून या सर्व ठिकाणचे / पान ४ वर-- घोटाळेबाजांना जेलमध्ये घालणार..!युतीची सत्ता आल्यावर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे राज्यात दंगली होणार नाहीत. मला सहा महिने गृहमंत्री केल्यास अजित पवारांसह सगळ्या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकेन, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.