शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पवारांची भाकरी करपणारच !

By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST

उध्दव ठाकरे यांचा टोला : तीन मंत्री असूनही सांगलीच्या विकासाचा खेळखंडोबा

इस्लामपूर : शरद पवारांची भाकरी करपलेली आहे. तीच भाकरीच ते फिरवत आहेत. त्यामुळे इथून पुढेही त्यांचे उमेदवार करपणारच आहेत, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी इस्लामपूर येथील मेळाव्यात लगावला. इस्लामपूर येथील सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्'ांतील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते आ. सुभाष देसाई, रामदास कदम, संपर्क नेते दिवाकर रावते उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे विदर्भ, मराठवाड्यात आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्'ात तीन मंत्री असूनही विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. जत तालुक्यातील गावे पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची तयारी ठेवतात, तर कानडी अत्याचाराला कंटाळलेला सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडतोय. या सर्व जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष आहे.प्रत्येक घरात पोलीस दिला तरी अत्याचार रोखता येणार नाहीत, असे गृहमंत्रीच म्हणू लागले, तर या राज्यातील महिला, मुली सुरक्षित कशा राहतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वर्ष झाले तरी सापडत नाहीत. पोलीस मात्र हत्येचे धागेदोरे हाती लागल्याचे सांगतात, तपासासाठी दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधतात. मग या सरकारने जादूटोणाविरोधी कायदा कशासाठी केला?या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला औषधालासुध्दा ठेवायचे नाही. सांगलीतील पाच जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढविणार असून या सर्व ठिकाणचे / पान ४ वर-- घोटाळेबाजांना जेलमध्ये घालणार..!युतीची सत्ता आल्यावर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे राज्यात दंगली होणार नाहीत. मला सहा महिने गृहमंत्री केल्यास अजित पवारांसह सगळ्या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकेन, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.