शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

पवार पंतप्रधान तर जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुण कांबळे, ...

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुण कांबळे, खंडेराव जाधव, संजय कोरे, छाया पाटील, रोझा किणीकर, संग्राम पाटील, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करत नेत्यांना पाठबळ देण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार देशाचे पंतप्रधान तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व केक कापून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, पक्ष प्रतोद संजय कोरे, नगरसेवक खंडेराव जाधव, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया पाटील, शहराध्यक्ष रोझा किणीकर उपस्थित होत्या.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून राज्याला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांना आपण सर्वांनी एकसंघपणे पाठबळ द्यावे लागेल. नगरपालिकेसह सर्व निवडणुका प्रचंड ताकदीने लढण्याची, जिंकण्याची व्यूहरचना करावी लागेल. भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करू.

राज्य सरचिटणीस अरुण कांबळे म्हणाले, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करणे, हे मोठ्या भाग्याचे आहे. संजय कोरे, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, छाया पाटील, रोझा किणीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खासदार शरद पवार हे देशाचे पंतप्रधान तर जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुभाष सूर्यवंशी, आनंदराव पाटील, अ‍ॅड. विश्वासराव पाटील, एम. जे. पाटील, संजय पाटील, प्रा. कृष्णा मंडले, रफिक पठाण, सचिन कोळी, स्वरूप मोरे, प्रकाश कांबळे, शैलजा जाधव, वैशाली पाटील, प्रियांका साळुंखे, सागर चव्हाण, विशाल सूर्यवंशी, मोहन भिंगार्डे, विनायक यादव, विनायक कदम, शुभम पाटील उपस्थित होते. गोपाळ नागे यांनी आभार मानले.