शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव नगरपालिकेत पाटील फॅक्टर निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST

दत्ता पाटील तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ...

दत्ता पाटील

तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ‘अंडरस्टॅन्डिंग’ची चर्चा होत असल्याने तासगावचे पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे शहराचे लक्ष आहे. वेगवेगळ्या पक्षातील पाटील एकजुटीने स्वत:च नेतृत्व करणार की अंजनी, चिंचणीच्या पाटलांचा झेंडा घेऊन उतरणार, याची उत्सुकता आहे.

नगरपालिका निवडणुकीत तासगावच्या पाटलांची भूमिका निर्णायक ठरली आहे. अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. पहिले थेट नगराध्यक्ष डी. एम. पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी १९७४ ते १९८१ आणि १९९१ ते १९९५ या कालावधीत नगराध्यक्षपद भूषवले होते. या काळातच तासगावच्या पाटीलकीचे महत्त्व अधोरेखित झाले. तालुक्यातील अन्य नेत्यांना न जुमानता त्यांनी कर्तृृत्वाचा ठसा उमटवला. त्यानंतर गुलाबकाका पाटील यांनीही स्वत:चे नेतृत्व सिध्द केले.

तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत तासगावचा पाटील फॅक्टर निर्णायक ठरला आहे.

राष्ट्रवादीकडून अजय पाटील, भाजपकडून बाबासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. पालिकेत सत्ता कोणत्याही गटाची असली आणि सत्तेत पाटील असले, तरी निर्णय प्रक्रिया मात्र अंजनी आणि चिंचणीच्या पाटलांच्या हातातच राहिली आहे. सत्तेत आल्यानंतर शहरातील पाटील कोणत्याच निर्णयात दिसून येत नाहीत. महादेव पाटील यांनी खासदार संजयकाकांशी फारकत घेत शहरातील काँग्रेसचे नेतृत्व केले. गतवेळच्या निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला. अजय पाटील यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली, तर बाबासाहेब पाटील आणि दिग्विजय पाटील यांनी भाजपची धुरा सांभाळली होती. शहरातील पाटील वेगवेगळ्या गटातटांत विभागल्यामुळे अंजनी किंवा चिंचणीच्या पाटलांचे वर्चस्व कायम राहिले.

यावेळच्या निवडणुकीला अद्याप अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वपक्षीय पॅनेल चर्चेत आले आहे. शहरातील सर्व पाटील एकत्रित येऊन लढणार की अंजनी, चिंचणीच्या झेंडा घेऊन, स्वबळ आजमावून रिंगणात उतरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

प्रभाव नेत्यांचाच

शहराच्या राजकीय पटलावर अनेक पाटील सातत्याने सक्रिय आहेत. मात्र त्यांना अद्याप एकहाती नेतृत्व सिध्द करता आले नाही. अंजनी किंवा चिंचणीतील नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय शहरात प्रभाव पाडता आला नाही. एखादा पाटील वरचढ ठरू लागल्याचे दिसून येताच, नेत्यांकडूनच पंख छाटले गेल्याचा अनुभवही नवा नाही.