शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव नगरपालिकेत पाटील फॅक्टर निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST

दत्ता पाटील तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ...

दत्ता पाटील

तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ‘अंडरस्टॅन्डिंग’ची चर्चा होत असल्याने तासगावचे पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे शहराचे लक्ष आहे. वेगवेगळ्या पक्षातील पाटील एकजुटीने स्वत:च नेतृत्व करणार की अंजनी, चिंचणीच्या पाटलांचा झेंडा घेऊन उतरणार, याची उत्सुकता आहे.

नगरपालिका निवडणुकीत तासगावच्या पाटलांची भूमिका निर्णायक ठरली आहे. अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. पहिले थेट नगराध्यक्ष डी. एम. पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी १९७४ ते १९८१ आणि १९९१ ते १९९५ या कालावधीत नगराध्यक्षपद भूषवले होते. या काळातच तासगावच्या पाटीलकीचे महत्त्व अधोरेखित झाले. तालुक्यातील अन्य नेत्यांना न जुमानता त्यांनी कर्तृृत्वाचा ठसा उमटवला. त्यानंतर गुलाबकाका पाटील यांनीही स्वत:चे नेतृत्व सिध्द केले.

तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत तासगावचा पाटील फॅक्टर निर्णायक ठरला आहे.

राष्ट्रवादीकडून अजय पाटील, भाजपकडून बाबासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. पालिकेत सत्ता कोणत्याही गटाची असली आणि सत्तेत पाटील असले, तरी निर्णय प्रक्रिया मात्र अंजनी आणि चिंचणीच्या पाटलांच्या हातातच राहिली आहे. सत्तेत आल्यानंतर शहरातील पाटील कोणत्याच निर्णयात दिसून येत नाहीत. महादेव पाटील यांनी खासदार संजयकाकांशी फारकत घेत शहरातील काँग्रेसचे नेतृत्व केले. गतवेळच्या निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला. अजय पाटील यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली, तर बाबासाहेब पाटील आणि दिग्विजय पाटील यांनी भाजपची धुरा सांभाळली होती. शहरातील पाटील वेगवेगळ्या गटातटांत विभागल्यामुळे अंजनी किंवा चिंचणीच्या पाटलांचे वर्चस्व कायम राहिले.

यावेळच्या निवडणुकीला अद्याप अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वपक्षीय पॅनेल चर्चेत आले आहे. शहरातील सर्व पाटील एकत्रित येऊन लढणार की अंजनी, चिंचणीच्या झेंडा घेऊन, स्वबळ आजमावून रिंगणात उतरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

प्रभाव नेत्यांचाच

शहराच्या राजकीय पटलावर अनेक पाटील सातत्याने सक्रिय आहेत. मात्र त्यांना अद्याप एकहाती नेतृत्व सिध्द करता आले नाही. अंजनी किंवा चिंचणीतील नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय शहरात प्रभाव पाडता आला नाही. एखादा पाटील वरचढ ठरू लागल्याचे दिसून येताच, नेत्यांकडूनच पंख छाटले गेल्याचा अनुभवही नवा नाही.