शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

तासगाव नगरपालिकेत पाटील फॅक्टर निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST

दत्ता पाटील तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ...

दत्ता पाटील

तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ‘अंडरस्टॅन्डिंग’ची चर्चा होत असल्याने तासगावचे पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे शहराचे लक्ष आहे. वेगवेगळ्या पक्षातील पाटील एकजुटीने स्वत:च नेतृत्व करणार की अंजनी, चिंचणीच्या पाटलांचा झेंडा घेऊन उतरणार, याची उत्सुकता आहे.

नगरपालिका निवडणुकीत तासगावच्या पाटलांची भूमिका निर्णायक ठरली आहे. अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. पहिले थेट नगराध्यक्ष डी. एम. पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी १९७४ ते १९८१ आणि १९९१ ते १९९५ या कालावधीत नगराध्यक्षपद भूषवले होते. या काळातच तासगावच्या पाटीलकीचे महत्त्व अधोरेखित झाले. तालुक्यातील अन्य नेत्यांना न जुमानता त्यांनी कर्तृृत्वाचा ठसा उमटवला. त्यानंतर गुलाबकाका पाटील यांनीही स्वत:चे नेतृत्व सिध्द केले.

तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत तासगावचा पाटील फॅक्टर निर्णायक ठरला आहे.

राष्ट्रवादीकडून अजय पाटील, भाजपकडून बाबासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. पालिकेत सत्ता कोणत्याही गटाची असली आणि सत्तेत पाटील असले, तरी निर्णय प्रक्रिया मात्र अंजनी आणि चिंचणीच्या पाटलांच्या हातातच राहिली आहे. सत्तेत आल्यानंतर शहरातील पाटील कोणत्याच निर्णयात दिसून येत नाहीत. महादेव पाटील यांनी खासदार संजयकाकांशी फारकत घेत शहरातील काँग्रेसचे नेतृत्व केले. गतवेळच्या निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला. अजय पाटील यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली, तर बाबासाहेब पाटील आणि दिग्विजय पाटील यांनी भाजपची धुरा सांभाळली होती. शहरातील पाटील वेगवेगळ्या गटातटांत विभागल्यामुळे अंजनी किंवा चिंचणीच्या पाटलांचे वर्चस्व कायम राहिले.

यावेळच्या निवडणुकीला अद्याप अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वपक्षीय पॅनेल चर्चेत आले आहे. शहरातील सर्व पाटील एकत्रित येऊन लढणार की अंजनी, चिंचणीच्या झेंडा घेऊन, स्वबळ आजमावून रिंगणात उतरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

प्रभाव नेत्यांचाच

शहराच्या राजकीय पटलावर अनेक पाटील सातत्याने सक्रिय आहेत. मात्र त्यांना अद्याप एकहाती नेतृत्व सिध्द करता आले नाही. अंजनी किंवा चिंचणीतील नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय शहरात प्रभाव पाडता आला नाही. एखादा पाटील वरचढ ठरू लागल्याचे दिसून येताच, नेत्यांकडूनच पंख छाटले गेल्याचा अनुभवही नवा नाही.