शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

तासगाव नगरपालिकेत पाटील फॅक्टर निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST

दत्ता पाटील तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ...

दत्ता पाटील

तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ‘अंडरस्टॅन्डिंग’ची चर्चा होत असल्याने तासगावचे पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे शहराचे लक्ष आहे. वेगवेगळ्या पक्षातील पाटील एकजुटीने स्वत:च नेतृत्व करणार की अंजनी, चिंचणीच्या पाटलांचा झेंडा घेऊन उतरणार, याची उत्सुकता आहे.

नगरपालिका निवडणुकीत तासगावच्या पाटलांची भूमिका निर्णायक ठरली आहे. अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. पहिले थेट नगराध्यक्ष डी. एम. पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी १९७४ ते १९८१ आणि १९९१ ते १९९५ या कालावधीत नगराध्यक्षपद भूषवले होते. या काळातच तासगावच्या पाटीलकीचे महत्त्व अधोरेखित झाले. तालुक्यातील अन्य नेत्यांना न जुमानता त्यांनी कर्तृृत्वाचा ठसा उमटवला. त्यानंतर गुलाबकाका पाटील यांनीही स्वत:चे नेतृत्व सिध्द केले.

तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत तासगावचा पाटील फॅक्टर निर्णायक ठरला आहे.

राष्ट्रवादीकडून अजय पाटील, भाजपकडून बाबासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. पालिकेत सत्ता कोणत्याही गटाची असली आणि सत्तेत पाटील असले, तरी निर्णय प्रक्रिया मात्र अंजनी आणि चिंचणीच्या पाटलांच्या हातातच राहिली आहे. सत्तेत आल्यानंतर शहरातील पाटील कोणत्याच निर्णयात दिसून येत नाहीत. महादेव पाटील यांनी खासदार संजयकाकांशी फारकत घेत शहरातील काँग्रेसचे नेतृत्व केले. गतवेळच्या निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला. अजय पाटील यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली, तर बाबासाहेब पाटील आणि दिग्विजय पाटील यांनी भाजपची धुरा सांभाळली होती. शहरातील पाटील वेगवेगळ्या गटातटांत विभागल्यामुळे अंजनी किंवा चिंचणीच्या पाटलांचे वर्चस्व कायम राहिले.

यावेळच्या निवडणुकीला अद्याप अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वपक्षीय पॅनेल चर्चेत आले आहे. शहरातील सर्व पाटील एकत्रित येऊन लढणार की अंजनी, चिंचणीच्या झेंडा घेऊन, स्वबळ आजमावून रिंगणात उतरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

प्रभाव नेत्यांचाच

शहराच्या राजकीय पटलावर अनेक पाटील सातत्याने सक्रिय आहेत. मात्र त्यांना अद्याप एकहाती नेतृत्व सिध्द करता आले नाही. अंजनी किंवा चिंचणीतील नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय शहरात प्रभाव पाडता आला नाही. एखादा पाटील वरचढ ठरू लागल्याचे दिसून येताच, नेत्यांकडूनच पंख छाटले गेल्याचा अनुभवही नवा नाही.