शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव-संजयकाकांमध्ये जुंपली

By admin | Updated: August 29, 2016 00:23 IST

एकमेकांवर टीका : सांगलीतील राजकारण तापले

सांगली/तासगाव : मोदींच्या गोमूत्राने पवित्र झालेल्या आमदारांना नाहक महत्त्व मिळते, अशी टीका माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी सांगलीत केली होती. त्याला उत्तर देताना खासदार संजयकाका पाटील यांनी, अशी भाषा पुन्हा वापराल, तर अनीतीने उभारलेले साम्राज्य अडचणीत येईल, असा इशारा रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला. पतंगराव कदम आणि संजयकाकांमधील राजकीय संघर्ष आजही कायम आहे. त्यामुळेच पतंगरावांच्या टीकेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोमूत्राने पवित्र झालेल्या आमदारांना नाहक महत्त्व प्राप्त होते, नको तेवढी या लोकांना प्रसिद्धी मिळते, अशी टीका कदम यांनी केली होती. या टीकेचा समाचार रविवारी संजयकाका पाटील यांनी घेतला. ते म्हणाले की, पतंगरावांचे मानसिक संतुलन सध्या बिघडलेले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरून केलेली टीका पतंगरावांसारख्या ज्येष्ठ राजकारण्याला शोभत नाही. सत्तेचा वापर करून अडचणीत आणायचेच असते, तर अनीतीने उभारलेले यांचे साम्राज्य कधीच अडचणीत आले असते. त्यामुळे त्यांनी जपून टीका करावी. पंतप्रधानांनी देशात ‘नीट’ लागू केल्यामुळे, समाजाचे शोषण करून दोनशे ते तीनशे कोटी रुपये काही शिक्षण संस्था मिळवीत होत्या, त्यांना ‘ब्रेक’ लागलेला आहे. कदम यांचे मानसिक संतुलन बिघडण्यास हीच गोष्ट कारणीभूत ठरली आहे. गोमूत्राने पवित्र झालेल्या आमदारांवर त्यांनी टीका केली आहे. मी खासदार असलो आणि प्रत्यक्ष माझ्यावर जरी टीका केली नसली तरी, आमच्या पक्षाच्या आमदारांबद्दल त्यांनी अशी भाषा वापरणे हे निंदनीय आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे समाजहितासाठी संस्था काढण्याचे काम हे लोक करीत नाहीत. धनवंत बापाच्या मुलांसाठी संस्था उभारून निधी गोळा करण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे यापुढे अशी टीका त्यांनी केली, तर त्यांचे हे साम्राज्य अडचणीत येईल, असा इशारा पाटील यांनी दिला. पतंगराव कदम आणि संजयकाका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. कवठेमहांकाळ येथे यापूर्वी झालेल्या एका सभेतही पतंगरावांनी, गोमूत्राने पवित्र झालेले खासदार, अशी टीका त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केली होती. त्यावेळीही संजयकाकांनी टीकेला उत्तर दिल्याने राजकीय वातावरण तापले होते. (प्रतिनिधी)