शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मोहनरावांपेक्षा पतंगराव परिपक्व नेते

By admin | Updated: January 3, 2017 23:42 IST

जयंत पाटील : मुंबईत गेल्याने काहीजण भांबावलेत; निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सक्षम

सांगली : काही लोक मुंबईला गेल्यावर भांबावतात. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. त्यांच्यापेक्षा आम्हाला पतंगराव कदम परिपक्व नेते वाटतात, असे मत राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पाटील म्हणाले की, पतंगराव कदम यांना राज्याच्या आणि केंद्रातील राजकारणाचा अधिक अनुभव आहे. त्यामुळे त्यांची परिपक्वता अधिक आहे. काँग्रेसचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नसल्याचे मोहनरावांनी सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी निवडणुका लढविण्यासाठी सक्षम आहे. आम्ही कोणाकडेही असा प्रस्ताव दिलेला नाही. स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. स्थानिक पातळीवर काही पक्ष आणि नेते आम्हाला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांची मदत घेऊ. आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी संपल्याचे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी तो गैरसमज दूर करावा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आबाप्रेमी कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांचे सर्व गड आम्ही जिंकून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना त्यांची जागा दाखवून देऊ. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले की, सत्तेत गेल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळत असूनही ते त्याबद्दल बोलत नाहीत. विरोधात असते तर नक्कीच त्यांनी आंदोलन केले असते. राजारामबापूंवर टीका करणाऱ्या सदाभाऊंना सत्तेत गेल्यामुळे कोणत्याही गोष्टीचे भान राहिलेले नाही. वसंतदादा पाटील, राजारामबापू आणि गुलाबराव पाटील या नेत्यांनी जिल्'ासह राज्याच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. अशा थोर नेत्यांवर टीका करताना खोत यांना स्वत:चा मोठेपणा सिद्ध करायचा आहे. ते या नेत्यांपेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत, ही गोष्ट दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)शिवसेनेची नको तेवढी थट्टाराज्यातील राजकारणात प्रथमच सहपालकमंत्री हे पद अस्तित्वात आले आहे. ही पदे शिवसेनेला दिली जात आहेत. आणखी किती थट्टा होईपर्यंत शिवसेना या गोष्टी सहन करणार आहे, असा उपरोधक सवालही पाटील यांनी केला.मी सदाभाऊंची शिफारस केली होती!मंत्रिपदासाठी भाजपच्या नेत्यांकडे शिफारस करण्याबाबत सदाभाऊ खोत यांनी विनंती केली होती. मतदारसंघातील सर्वच लोकांची कामे मी नेहमी करीत असतो. विरोधक असला तरी मी राजकारण आणत नाही. त्यामुळे सदाभाऊंसाठी मी शिफारस केली होती. ते आता माझ्यावर टीका करीत असले तरी, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. सत्ता आल्यावर कधी भान सोडू नये. जमीन सोडायची असते. जेव्हा सत्ता जाते, तेव्हा अशा लोकांची खूप वाईट परिस्थिती होते, असे जयंत पाटील म्हणाले. आ. नाईकांवर अन्यायचजिल्हा परिषदेवर सत्ता आल्यानंतरच शिवाजीराव नाईकांना मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. शिवाजीराव नाईक ज्येष्ठ नेते आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येणार नाही, याची मुख्यमंत्र्यांना कल्पना असल्याने, त्यांनी असे खोटे आश्वासन त्यांना दिले आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.दोन नेत्यांमध्ये गोेंधळस्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात शेतीमालाचे दर पडण्यावरून मतभिन्नता दिसून येत आहे. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये मतांचा हा गोंधळ आता लोकांनाही दिसला आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज नसते किंवा शेतकऱ्यांवर नोटाबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही, असे मत या दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे मांडावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.