शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव-जयंतराव यांच्यात ‘सोनहिरा’वर गुफ्तगू

By admin | Updated: May 3, 2016 00:43 IST

सलोखा कायम : कारखानदारी व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची शक्यता

कडेगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम या दोन्ही दिग्गज नेत्यांत सोनहिरा साखर कारखाना येथे अध्यक्षांच्या दालनात गुप्त चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना राजकीय सल्ले दिल्याचे समजते. राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात नेत्यांमध्ये असलेला परंपरागत सलोखा आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले. वांगी येथील सोनहिरा कार्यालयात एका विवाह समारंभानिमित्त जयंतराव पाटील आले होते. या विवाहासाठी पतंगराव कदमही उपस्थित होते. विवाह समारंभ आटोपून दोन्ही नेते दुपारी ४ वाजता सोनहिर काखाना येथे आले. यावेळी अध्यक्ष मोहनराव कदम यांच्या दालनात दोन्ही नेत्यांनी एकांतात चर्चा केली. यावेळी पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी व बाबासाहेब सूर्यवंशी यांनी दोघांचेही स्वागत करून सत्कार केला. यावेळी चिफ केमिस्ट प्रकाश देशमुख, अर्जुन जगदाळे आदी उपस्थित होते.पाटील यांनी कदम यांच्याकडून सोनहिरा कारखान्याच्या गाळप क्षमता, आसवनी प्रकल्प, सहवीजनिर्मिती प्रकल्प याबाबत माहिती घेतली. पतंगरावांनी एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर दिला, १०० कोटीचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणानंतर माझा कारखाना राज्यात सर्वाधिक दर देणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसर असलेले तसेच नेतृत्वाच्या शर्यतीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही नेत्यांत आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. यावेळी पाटील भाजपशी सलोखा करून रस्ता चुकू नयेत म्हणून पतंगरावांनी काही टिप्स दिल्याचेही समजते. आगामी जिल्हा परिषद तसेच अन्य निवडणुकांबाबत दोघात चर्चा झाली असल्याची शक्यता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. परंतु याबाबतचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. (वार्ताहर)दोघांनी एकसंध व्हावे : कार्यकर्त्यांची इच्छाप्रारंभी जयंतराव व पतंगराव या दोन्ही नेत्यांचा सभागृहामध्ये सत्कार केला. यावेळी पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी यांनी, भीषण दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत आहे. पतंगराव कदम यांनी पाणी आणले, म्हणून आम्ही सुखी आहे. आता तुम्ही दोघांनी एकसंध होऊन पुन्हा महाराष्ट्र उभा करा, असे सांगितले. यावर जयंतराव पाटील यांनी एकविचाराने वाटचालीचे संकेत दिले.वांगी (ता. कडेगाव) येथे सोनहिरा कारखाना येथे अध्यक्षांच्या दालनात माजीमंत्री डॉ. पतंगराव कदम, आ. जयंत पाटील यांची गुप्त चर्चा झाली.