शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणातून प्राचीन इतिहासाचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

अविनाश कोळी/सांगली पाषाणाला पाझर फुटला की समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. अशाच पाषाणांमधून इतिहासात लपलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक समृद्धीचा पाझर ...

अविनाश कोळी/सांगली

पाषाणाला पाझर फुटला की समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. अशाच पाषाणांमधून इतिहासात लपलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक समृद्धीचा पाझर गेल्या काही वर्षांत मिरजेतील संशोधकांच्या अथक प्रयत्नातून फुटला. जमिनीच्या उदरातून इतिहासाचा खजाना बाहेर पडताना हजारो वर्षांपूर्वीच्या प्रथा, अर्थकारण, राजवटी, शिस्त, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणे यांचा उलगडा झाला. आता हा खजाना भविष्यातही जतन करून ठेवण्याचे आव्हान आहे. एकीकडे पाषाणातून इतिहासाचा खजाना उलगडत असताना, शासन पाषाण बनून याकडे दुर्लक्ष करीत आहे.

वर्तमान आणि भविष्याची वाटचाल करताना इतिहासातील अनुभवही तितकेच महत्त्वाचे ठरत असतात. म्हणूनच संशोधनाची ही बिकट वाट व्रतस्थ असलेल्या संशोधकांनी निवडली. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत २० शिलालेखांचा शोध लागला आहे. त्यामध्ये वीरगळ, सती शिळेचा लेख, दानलेख, मूर्ती लेख, गद्देगाळ अशा शिलालेखांचा समावेश आहे. ऐतिहासिक पुराव्यासाठी शिलालेख हे सर्वात विश्वसनीय प्रमाण मानले जाते. अशा विश्वसनीय लेखांचे जतन सांगली जिल्ह्यात होत आहे. १० व्या ते १३ व्या शतकातील प्राचीन शिलालेख शोधले गेले. चालुक्य, कलचुरी, शिलाहार, यादव राजवटींमधील संस्कृतीवर प्रकाशझोत टाकण्यात आला.

हजारो वर्षांपूर्वी कोणते चलन वापरले जात होते, त्यावेळचे अर्थकारण कसे होते, दळणवळण कसे चालायचे, दानधर्म, धार्मिक कार्यक्रमांचे स्थान काय होते, प्रथा, परंपरा कशा होत्या, योद्धे, राजा कोण होता, त्याची राजवट किती काळ राहिली, त्याला मरण कसे आले, अशा एक ना अनेक गोष्टी समाेर आल्या. हजारो वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांची संघटना अस्तित्वात होती. त्यांच्याकडून समुद्रमार्गे मालाची निर्यात केली जायची. इतकेच नव्हे, तर आताच्या व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी (सीएसआर) प्रमाणे प्राचीन काळातही व्यापारी सामाजिक उत्तरदायित्व जपत असत, याचे पुरावेसुद्धा या पाषाणांनी दिले. वीरगळावरील महाराष्ट्रातील सर्वात जुना म्हणजे ९५० वर्षांपूर्वीचा लेख कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगावात सापडला.

अशा अनेक कहाण्या इतिहासाच्या पोतडीतून बाहेर येत असताना, शासन मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे. अनेक देशांमध्ये छाेट्या संशोधनांची दखल शासनाकडून तत्परतेने घेतली जाते. महाराष्ट्रात आणि देशातही कोणत्याच यंत्रणेकडून ऐतिहासिक संशोधनाची दखल घेतली जात नाही. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या गॅझेटियरमध्ये याच्या नोंदी घ्याव्यात, संशोधकांना प्रोत्साहन द्यावे, संशोधनाबद्दलची माहिती घ्यावी, अशा कोणत्याही गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत. शासनाचा पुरातत्व विभाग इतिहासाचा व आपला काही संबंध नसल्याच्या भूमिकेत असलेल्या पुरातत्व विभागाला जाग आली, तर या पाषाणांना देवपण येईल.