शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणातून प्राचीन इतिहासाचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

अविनाश कोळी/सांगली पाषाणाला पाझर फुटला की समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. अशाच पाषाणांमधून इतिहासात लपलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक समृद्धीचा पाझर ...

अविनाश कोळी/सांगली

पाषाणाला पाझर फुटला की समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. अशाच पाषाणांमधून इतिहासात लपलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक समृद्धीचा पाझर गेल्या काही वर्षांत मिरजेतील संशोधकांच्या अथक प्रयत्नातून फुटला. जमिनीच्या उदरातून इतिहासाचा खजाना बाहेर पडताना हजारो वर्षांपूर्वीच्या प्रथा, अर्थकारण, राजवटी, शिस्त, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणे यांचा उलगडा झाला. आता हा खजाना भविष्यातही जतन करून ठेवण्याचे आव्हान आहे. एकीकडे पाषाणातून इतिहासाचा खजाना उलगडत असताना, शासन पाषाण बनून याकडे दुर्लक्ष करीत आहे.

वर्तमान आणि भविष्याची वाटचाल करताना इतिहासातील अनुभवही तितकेच महत्त्वाचे ठरत असतात. म्हणूनच संशोधनाची ही बिकट वाट व्रतस्थ असलेल्या संशोधकांनी निवडली. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत २० शिलालेखांचा शोध लागला आहे. त्यामध्ये वीरगळ, सती शिळेचा लेख, दानलेख, मूर्ती लेख, गद्देगाळ अशा शिलालेखांचा समावेश आहे. ऐतिहासिक पुराव्यासाठी शिलालेख हे सर्वात विश्वसनीय प्रमाण मानले जाते. अशा विश्वसनीय लेखांचे जतन सांगली जिल्ह्यात होत आहे. १० व्या ते १३ व्या शतकातील प्राचीन शिलालेख शोधले गेले. चालुक्य, कलचुरी, शिलाहार, यादव राजवटींमधील संस्कृतीवर प्रकाशझोत टाकण्यात आला.

हजारो वर्षांपूर्वी कोणते चलन वापरले जात होते, त्यावेळचे अर्थकारण कसे होते, दळणवळण कसे चालायचे, दानधर्म, धार्मिक कार्यक्रमांचे स्थान काय होते, प्रथा, परंपरा कशा होत्या, योद्धे, राजा कोण होता, त्याची राजवट किती काळ राहिली, त्याला मरण कसे आले, अशा एक ना अनेक गोष्टी समाेर आल्या. हजारो वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांची संघटना अस्तित्वात होती. त्यांच्याकडून समुद्रमार्गे मालाची निर्यात केली जायची. इतकेच नव्हे, तर आताच्या व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी (सीएसआर) प्रमाणे प्राचीन काळातही व्यापारी सामाजिक उत्तरदायित्व जपत असत, याचे पुरावेसुद्धा या पाषाणांनी दिले. वीरगळावरील महाराष्ट्रातील सर्वात जुना म्हणजे ९५० वर्षांपूर्वीचा लेख कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगावात सापडला.

अशा अनेक कहाण्या इतिहासाच्या पोतडीतून बाहेर येत असताना, शासन मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे. अनेक देशांमध्ये छाेट्या संशोधनांची दखल शासनाकडून तत्परतेने घेतली जाते. महाराष्ट्रात आणि देशातही कोणत्याच यंत्रणेकडून ऐतिहासिक संशोधनाची दखल घेतली जात नाही. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या गॅझेटियरमध्ये याच्या नोंदी घ्याव्यात, संशोधकांना प्रोत्साहन द्यावे, संशोधनाबद्दलची माहिती घ्यावी, अशा कोणत्याही गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत. शासनाचा पुरातत्व विभाग इतिहासाचा व आपला काही संबंध नसल्याच्या भूमिकेत असलेल्या पुरातत्व विभागाला जाग आली, तर या पाषाणांना देवपण येईल.