शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

कवितेतून परतत्त्वाचा अलौकिक अनुभव

By admin | Updated: December 7, 2015 00:30 IST

इंद्रजित देशमुख : तडसर येथे सुनंदा शेळके यांचा ‘काव्यरत्न’ पुरस्काराने गौरव

कडेगाव : कविता ही परतत्त्वाचा अनुभव असणारी असते. असा अनुभव देणाऱ्या कवी पांडुरंग माळी गुरुजींचा काव्याचा वारसा पुढे सुरू राहावा, यासाठीच ‘काव्यरत्न’ पुरस्कार पुत्राने सुरू करून त्यांचे जिवंत स्मारक उभे केले आहे. ही बाब कौतुकास्पद व साहित्यिकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.तडसर (ता. कडेगाव) येथे मराठी साहित्य परिषद (कडेगाव-खानापूर) व कवी पांडुरंग माळी यांच्या कुटुंबियांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कवयित्री प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांना ‘कवी पांडुरंग माळी काव्यरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी इंद्रजित देशमुख म्हणाले की, माणूस आयुष्यात कसा जगला, हे महत्त्वाचे असते. माणूस जिगरबाज, कर्तबगार असला तरच पुढची पिढीही संस्कारसंपन्न बनते. आज समाजामध्ये मानसिकता बदललेली आहे. याला सर्वस्वी आजची बदललेली सामाजिक परिस्थितीच जबाबदार आहे. समाजामध्ये सामाजिक बदल घडविण्याचे काम साहित्यिकच करत असतात. साहित्यिकाचे जगणे अनुभवनिष्ठ असते. जी माणसे कर्तबगार व विनम्र असतात, अशीच माणसे साहित्यिक व कलावंत असतात. शब्दांशी खेळणारा कवी आपल्या काव्यातच आनंद शोधतो. अशापैकी एक कवी पांडुरंग माळी यांचे स्मारक पुरस्काररूपाने अनेक नवकवींना आत्मबळ देणारे ठरणार आहे.डॉ. सुनंदा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. सदानंद माळी यांनी स्वागत, तर प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मन्सूर जमादार यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, सुु. धों. मोहिते, अ‍ॅड. सतीश लोखंडे, त्रिलोकनाथ जोशी, रघुराज मेटकरी, दत्ता सपकाळ, शाहू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शांतिनाथ मांगले यांनी सूत्रसंचालन केले. आकाश पाटील (सरगर) यांनी आभार मानले. (वार्ताहर)