शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पैरा फेडाफेडीत विकास आघाडी अस्वस्थ

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : स्वाभिमानी संघटनेचा मात्र पांग फिटला

अशोक पाटील -- इस्लामपूर --लोकसभा, विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यात जयंत पाटील यांनाच विरोधकांनी लक्ष्य केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांच्यासह काही काँग्रेसचे नेते एकमेकांचा पैरा फेडून राजकीय मशागत करतात. त्यातूनच स्वाभिमानी संघटनेला सत्तेत स्थान मिळाले आहे. मात्र आ. नाईक यांचे मंत्रीपद हुकल्याने विकास आघाडी अस्वस्थ आहे.गेल्या दहा वर्षांत जयंत पाटील हेच विरोधक मानून आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, वैभव नायकवडी, जितेंद्र पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधात असलेले छोटे-मोठे गट आणि ऊस उत्पादक खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहिले आहेत. याचा फायदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला झाला आहे. सलग दोनवेळा लोकसभा निवडणुकीत शेट्टी विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी मोदी लाटेचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचा पैरा फेडण्यासाठी विधानसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदतीचा हात देतात. त्यानुसार आमदार शिवाजीराव नाईक यांच्या विकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात अग्रस्थानी राहून त्यांनी पैरा फेडला आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत गेली. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांनी भाजपात प्रवेश करुन निवडणूक लढवली. याचवेळी त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, अशी हवा होती. मात्र भाजपने घटकपक्षांना न्याय देण्याचे धोरण निश्चित केल्याने ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांना आमदारकीपाठोपाठ मंत्रीपदही देण्यात आले. त्यामुळे विकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत. नाईलाजास्तवच खोत यांचा सत्कार घेऊन, आपण एक आहोत, असे ते भासवत आहेत.एकेकाळी ‘स्वाभिमानी’ला मतदान केंद्रावर प्रतिनिधी मिळत नव्हता. आता एक खासदार आणि एक मंत्रीपद मिळाल्यानंतरही वाळवा-शिराळ्यात कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झालेली नाही. असे असले तरी वाळवा-शिराळ्यात भाजपपेक्षा ‘स्वाभिमानी’ची ताकद वाढली आहे.गेली दहा वर्षे राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडी काम करत आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही सर्व पक्षांना एकत्र घेऊन विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविणार आहे. घटकपक्षाला न्याय देण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळेच सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यात आम्हालाही आनंद आहे.- राहुल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य