शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पैरा फेडाफेडीत विकास आघाडी अस्वस्थ

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : स्वाभिमानी संघटनेचा मात्र पांग फिटला

अशोक पाटील -- इस्लामपूर --लोकसभा, विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यात जयंत पाटील यांनाच विरोधकांनी लक्ष्य केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांच्यासह काही काँग्रेसचे नेते एकमेकांचा पैरा फेडून राजकीय मशागत करतात. त्यातूनच स्वाभिमानी संघटनेला सत्तेत स्थान मिळाले आहे. मात्र आ. नाईक यांचे मंत्रीपद हुकल्याने विकास आघाडी अस्वस्थ आहे.गेल्या दहा वर्षांत जयंत पाटील हेच विरोधक मानून आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, वैभव नायकवडी, जितेंद्र पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधात असलेले छोटे-मोठे गट आणि ऊस उत्पादक खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहिले आहेत. याचा फायदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला झाला आहे. सलग दोनवेळा लोकसभा निवडणुकीत शेट्टी विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी मोदी लाटेचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचा पैरा फेडण्यासाठी विधानसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदतीचा हात देतात. त्यानुसार आमदार शिवाजीराव नाईक यांच्या विकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात अग्रस्थानी राहून त्यांनी पैरा फेडला आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत गेली. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांनी भाजपात प्रवेश करुन निवडणूक लढवली. याचवेळी त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, अशी हवा होती. मात्र भाजपने घटकपक्षांना न्याय देण्याचे धोरण निश्चित केल्याने ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांना आमदारकीपाठोपाठ मंत्रीपदही देण्यात आले. त्यामुळे विकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत. नाईलाजास्तवच खोत यांचा सत्कार घेऊन, आपण एक आहोत, असे ते भासवत आहेत.एकेकाळी ‘स्वाभिमानी’ला मतदान केंद्रावर प्रतिनिधी मिळत नव्हता. आता एक खासदार आणि एक मंत्रीपद मिळाल्यानंतरही वाळवा-शिराळ्यात कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झालेली नाही. असे असले तरी वाळवा-शिराळ्यात भाजपपेक्षा ‘स्वाभिमानी’ची ताकद वाढली आहे.गेली दहा वर्षे राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडी काम करत आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही सर्व पक्षांना एकत्र घेऊन विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविणार आहे. घटकपक्षाला न्याय देण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळेच सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यात आम्हालाही आनंद आहे.- राहुल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य