शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने नुकसानीचे आजपासून पंचनामे

By admin | Updated: December 14, 2014 00:40 IST

तीन तालुक्यांत अवकाळी : ८२४ हेक्टर बाधित; द्राक्ष, ज्वारी, डाळिंबाचे नुकसान

सांगली : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, ज्वारी व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ८२४ हेक्टरमधील पिकांना याचा फटका बसला आहे. याचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिले. आज, रविवारपासून पंचनाम्यांना सुरुवात होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला आहे; मात्र तासगाव, कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यात सर्वांत जास्त पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील २५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बहुतांश द्राक्ष पिकाचा समावेश आहे. तसेच खानापूर तालुक्यातील ४५३ हेक्टरमधील ज्वारीचे, द्राक्षाचे २८ हेक्टर व डाळिंबाचे १८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तासगाव तालुक्यात २५० हेक्टरवरील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित क्षेत्रातील नुकसान ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील ५,३४० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने पंचनामे पूर्ण केले असून, मदतीसाठी राज्य शासनाकडे शिफारस केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळीने द्राक्ष, डाळिंब, केळी व इतर पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी होत होती. त्यानुसार पंचनामे केले. यामध्ये ४ हजार २९६.७४ हेक्टर पिकांचे नुकसान हे ५० टक्क्याच्या आतील, तर १ हजार ४३ हेक्टर क्षेत्रातील नुकसान ५० टक्क्याच्या वर झाले आहे. त्यामुळे पंधरवड्यात सहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)