शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

पंचायत समिती ‘आपल्या’ गावी

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

तासगाव तालुका : चार दिवसात २० गावांना भेट

तासगाव : सर्वसामान्य लोकांची कामे गावातच व्हावीत, शेतकरी-गोरगरिबांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना लोकांना कळाव्यात, या उद्देशाने तासगाव पंचायत समितीने ‘पंचायत समिती आपल्या गावी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत चार दिवसात सुमारे २० गावांना भेटीचे कार्यक्रम झाले आहेत. पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख, तसेच राज्य सरकारच्या विविध खात्यांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन संबंधित गावात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकून घेतात. ज्या गावात जायचे आहे, त्या गावात आधीच लोकांना, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांना कळविण्यात येते. गावातील एखाद्या प्रशस्त सभागृहात सर्व अधिकारी व ग्रामस्थांची बैठक होते. यातून गावपातळीवरच्या तसेच वैयक्तिक स्वरुपाच्या शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या कामांची चर्चा होऊन किरकोळ प्रश्न जागीच निकालात काढण्यात येतात. गावपातळीवरील रस्त्यांचे, गटारींचे प्रश्न यासाठी निधीची आवश्यकता, या विषयावरही चर्चा होत असल्याचे चित्र आहे.मागील आठवड्यापासून पंचायत समितीने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे. चार दिवसात सावळज जिल्हा परिषद संपूर्ण मतदारसंघ मणेराजुरी, मांजर्डे मतदारसंघाचा काही भाग अशा २० गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी येता येत नसलेल्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचीही संधी मिळत असल्याने ग्रामस्थ आपले प्रश्न मांडत आहेत.पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी एक फलक तयार करुन तो गावातच लावण्यात येत आहे. याशिवाय विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावण्यात येत आहे.स्थानिक पातळीवरचे राजकारण बाजूला करीत शासन म्हणून पंचायत समितीकडून हा उपक्रम राबविला जात असल्याची प्रतिक्रिया तासगाव पंचायत समितीचे सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांनी दिली. (वार्ताहर)अन्न सुरक्षेसाठी खास प्रयत्न अन्न सुरक्षा योजनेत अनेकांच्या नावांचा समावेश झाला नाही. गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गरजूंना या योजनेचा लाभ देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे.विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावणार असल्याचेही हर्षला पाटील यांनी सांगितले.