शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

पंचायत समिती ‘आपल्या’ गावी

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

तासगाव तालुका : चार दिवसात २० गावांना भेट

तासगाव : सर्वसामान्य लोकांची कामे गावातच व्हावीत, शेतकरी-गोरगरिबांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना लोकांना कळाव्यात, या उद्देशाने तासगाव पंचायत समितीने ‘पंचायत समिती आपल्या गावी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत चार दिवसात सुमारे २० गावांना भेटीचे कार्यक्रम झाले आहेत. पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख, तसेच राज्य सरकारच्या विविध खात्यांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन संबंधित गावात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकून घेतात. ज्या गावात जायचे आहे, त्या गावात आधीच लोकांना, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांना कळविण्यात येते. गावातील एखाद्या प्रशस्त सभागृहात सर्व अधिकारी व ग्रामस्थांची बैठक होते. यातून गावपातळीवरच्या तसेच वैयक्तिक स्वरुपाच्या शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या कामांची चर्चा होऊन किरकोळ प्रश्न जागीच निकालात काढण्यात येतात. गावपातळीवरील रस्त्यांचे, गटारींचे प्रश्न यासाठी निधीची आवश्यकता, या विषयावरही चर्चा होत असल्याचे चित्र आहे.मागील आठवड्यापासून पंचायत समितीने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे. चार दिवसात सावळज जिल्हा परिषद संपूर्ण मतदारसंघ मणेराजुरी, मांजर्डे मतदारसंघाचा काही भाग अशा २० गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी येता येत नसलेल्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचीही संधी मिळत असल्याने ग्रामस्थ आपले प्रश्न मांडत आहेत.पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी एक फलक तयार करुन तो गावातच लावण्यात येत आहे. याशिवाय विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावण्यात येत आहे.स्थानिक पातळीवरचे राजकारण बाजूला करीत शासन म्हणून पंचायत समितीकडून हा उपक्रम राबविला जात असल्याची प्रतिक्रिया तासगाव पंचायत समितीचे सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांनी दिली. (वार्ताहर)अन्न सुरक्षेसाठी खास प्रयत्न अन्न सुरक्षा योजनेत अनेकांच्या नावांचा समावेश झाला नाही. गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गरजूंना या योजनेचा लाभ देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे.विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावणार असल्याचेही हर्षला पाटील यांनी सांगितले.