शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती ‘आपल्या’ गावी

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

तासगाव तालुका : चार दिवसात २० गावांना भेट

तासगाव : सर्वसामान्य लोकांची कामे गावातच व्हावीत, शेतकरी-गोरगरिबांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना लोकांना कळाव्यात, या उद्देशाने तासगाव पंचायत समितीने ‘पंचायत समिती आपल्या गावी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत चार दिवसात सुमारे २० गावांना भेटीचे कार्यक्रम झाले आहेत. पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख, तसेच राज्य सरकारच्या विविध खात्यांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन संबंधित गावात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकून घेतात. ज्या गावात जायचे आहे, त्या गावात आधीच लोकांना, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांना कळविण्यात येते. गावातील एखाद्या प्रशस्त सभागृहात सर्व अधिकारी व ग्रामस्थांची बैठक होते. यातून गावपातळीवरच्या तसेच वैयक्तिक स्वरुपाच्या शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या कामांची चर्चा होऊन किरकोळ प्रश्न जागीच निकालात काढण्यात येतात. गावपातळीवरील रस्त्यांचे, गटारींचे प्रश्न यासाठी निधीची आवश्यकता, या विषयावरही चर्चा होत असल्याचे चित्र आहे.मागील आठवड्यापासून पंचायत समितीने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे. चार दिवसात सावळज जिल्हा परिषद संपूर्ण मतदारसंघ मणेराजुरी, मांजर्डे मतदारसंघाचा काही भाग अशा २० गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी येता येत नसलेल्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचीही संधी मिळत असल्याने ग्रामस्थ आपले प्रश्न मांडत आहेत.पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी एक फलक तयार करुन तो गावातच लावण्यात येत आहे. याशिवाय विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावण्यात येत आहे.स्थानिक पातळीवरचे राजकारण बाजूला करीत शासन म्हणून पंचायत समितीकडून हा उपक्रम राबविला जात असल्याची प्रतिक्रिया तासगाव पंचायत समितीचे सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांनी दिली. (वार्ताहर)अन्न सुरक्षेसाठी खास प्रयत्न अन्न सुरक्षा योजनेत अनेकांच्या नावांचा समावेश झाला नाही. गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गरजूंना या योजनेचा लाभ देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे.विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावणार असल्याचेही हर्षला पाटील यांनी सांगितले.